CM Pramod Sawant: दिल्लीहून परतताच मुख्यमंत्री काय म्हणाले पहा...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण चांगलंच गाजत आहे. याप्रकरणी राज्याचे डीजीपी जसपाल सिंग यांची भूमिका संशयास्पद आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यातच काल, डीजीपी जसपाल सिंग दिल्लीला रवाना झाल्याची बातमी येताच मोठी कारवाई होणार असे म्हटले जात होते. परंतु अद्याप यासंबंधी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. यातच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची दिल्लीवारी अनेक अर्थांनी गाजली. दिल्ली एअरपोर्टवर माध्यमांकडून मुख्यंत्र्यांना आसगाव प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. ते थेट निघून गेले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.