9 वर्ष एकत्र राहूनही राज कपूर-नर्गिसची प्रेम कहाणी अधुरीच

नर्गिसला पाहताच राज कपूर तिच्या प्रेमात पडले आणि...
nargis dutt death anniversary love story of nargis dutt and raaj kapoor
nargis dutt death anniversary love story of nargis dutt and raaj kapoor Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडमध्ये नायकाचे नाव अनेकदा अभिनेत्रीसोबत जोडले जाते. अनेकवेळा दोघेही आपलं नातं स्वीकारून ते पार पाडतात, तर अनेक प्रेमकथा खऱ्या असूनही अपूर्ण राहतात. त्या कथांना स्थान मिळत नाही. अशीच एक अपूर्ण प्रेमकहाणी म्हणजे नर्गिस आणि राज कपूर यांची. बॉलीवूडमध्ये जेव्हा जेव्हा अपूर्ण प्रेमकहाण्यांची चर्चा होते तेव्हा पहिले नाव राज कपूर आणि नर्गिसचे घेतले जाते. आजही लोक राज कपूर आणि नर्गिसवर चित्रित केलेले 'प्यार हुआ इकरार हुआ' गाणे गुणगुणतात. 3 मे 1981 या दिवशी नर्गिस यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. नर्गिसच्या निधनानंतर राज कपूर खूप दु:खी झाले होते. (nargis dutt death anniversary love story of nargis dutt and raaj kapoor)

या दोघांच्या जोडीने लाईफमध्ये खूप हिट चित्रपट दिले. खऱ्या आयुष्यातही अनाठायी प्रेमानंतर दोघेही एकमेकांसोबत राहू शकले नाहीत. दोघांमधील प्रेम त्यांच्या चित्रपटांमध्येही स्पष्टपणे पाहायला मिळत होते. जेव्हा राज कपूर पहिल्यांदा नर्गिसला भेटले तेव्हा ती एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली होती. संवादादरम्यान, एकदा राज कपूर यांचा मुलगा ऋषी कपूरने सांगितले होते की, दोघे 1949 मध्ये अंदाज चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. नर्गिसला पाहताच राज कपूर तिच्या प्रेमात पडले आणि नर्गिसही प्रेम करू लागली.

nargis dutt death anniversary love story of nargis dutt and raaj kapoor
राजस्थानमध्ये ईदपूर्वी लाऊडस्पीकर लावण्यावरून गोंधळ, लाठी-काठीहल्ल्यानंतर इंटरनेट सेवा बंद

दोघांनी एकत्र अनेक चित्रपटात काम केले. त्यांचा पहिला चित्रपट 'आग' होता. यानंतर दोघांनी बरसात (1949), प्यार (1950), आवारा (1951), आशियाना (1952), पापी (1953), श्री 420 (1955), चोरी-चोरी (1956) असे हिट सिनेमे दिले. रिपोर्ट्सनुसार, 9 वर्षांच्या प्रदीर्घ रिलेशनशिपमध्ये राजने नर्गिसला अनेकदा आश्वासन दिले होते की तो आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करेल, पण तसे झाले नाही.

कदाचित राज कपूर पत्नी कृष्णा कपूरला कधीही सोडणार नाहीत, याची जाणीव नर्गिसला झाली असावी. त्यानंतर नर्गिसने असे पाऊल उचलले ज्याची राज कपूर यांनी कल्पनाही केली नसेल. 1957 मध्ये नर्गिसने राज कपूर यांना न सांगता सुनील दत्तसोबत मदर इंडिया हा चित्रपट साइन केला. यादरम्यान चित्रपटाच्या सेटवर आग लागली आणि सुनील दत्त यांनी नर्गिसला वाचवले, मात्र त्या स्वत: भाजल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर 11 मार्च 1998 रोजी नर्गिसने सुनील दत्तसोबत लग्न केले.

नर्गिसच्या लग्नाच्या बातमीने राज कपूरला पूर्णपणे तोडले. नर्गिसला विसरणे राज कपूरसाठी सोपे नव्हते. रिपोर्ट्सनुसार, राज कपूरची पत्नी कृष्णा कपूरने खुलासा केला होता की, ते रोज रात्री दारू पिऊन रडायचे. 1981 मध्ये कॅन्सरमुळे नर्गिसचा मृत्यू झाला. राज कपूर यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते आधी हसायला लागले आणि नंतर खूप रडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com