महाराष्ट्र तापतोय! पारा 43.4 अंशाच्या पार, चंद्रपूर जगातील तिसरे सर्वाधिक उष्ण शहर

जगातील सातवे सर्वात उष्ण शहर आणि देशातील दुसरे सर्वात उष्ण शहर होण्याचा विक्रमही अकोल्याच्या नावावर आहे.
Heat Wave Maharashtra
Heat Wave MaharashtraDainik Gomantak

चंद्रपूर (Chandrapur) चे नाव मंगळवारी (29 मार्च) जगातील तिसरे सर्वात उष्ण शहर म्हणून नोंदवले गेले. महाराष्ट्रातील विदर्भ हा देशातील सर्वात उष्ण प्रदेश असल्याचे आढळून आले आहे. चंद्रपूर हे महाराष्ट्रातील विदर्भातील चार महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. विदर्भातील चार प्रमुख शहरांमध्ये नागपूर, अमरावती, अकोला नंतर चंद्रपूरचा क्रमांक येतो. चंद्रपूरचे प्राचीन नाव चांदा आहे. चंद्राच्या नावावरून या शहराला हे नाव देण्यात आले आहे परंतु या शहराची ओळख चंद्रप्रकाशाच्या थंडपणामुळे नाही तर जगात तापणाऱ्या सूर्याच्या उष्णतेमुळे आहे. चंद्रपूरशिवाय विदर्भातील इतर शहरांबद्दल बोलायचे झाले तर अकोल्याचे तापमान मंगळवारी 43.3. होते.

जगातील सातवे सर्वात उष्ण शहर आणि देशातील दुसरे सर्वात उष्ण शहर होण्याचा विक्रमही अकोल्याच्या नावावर आहे. विदर्भातील इतर दोन शहरांमध्ये नागपूरमध्ये 41.5 अंश सेल्सिअस आणि वर्धामध्ये 42.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. केवळ गडचिरोलीचे तापमान (Temperature) 40 अंश सेल्सिअसच्या खाली म्हणजेच 39.6अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Heat Wave Maharashtra
Maharashtra Weather Update: येत्या चार दिवसांत उष्णतेचा पारा वाढणार

देशात महाराष्ट्र आणि राज्यात विदर्भात उष्णतेची नोंद झाली आहे

अशाप्रकारे महाराष्ट्रातील विदर्भातील गडचिरोली वगळता सर्व जिल्ह्यांचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदले गेले. आज बुधवारीही नागपुरात तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने आपल्या अहवालात वर्तवली आहे. यानंतर येथे तापमान थोडे कमी होईल. मात्र बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान (IMD) खात्याने वर्तवला आहे. यानंतर, हवामानात थोडा थंडपणा असेल.

Heat Wave Maharashtra
कोकणासाठी पर्यटन आणि पर्यावरण दोन्ही महत्त्वाचे

उष्णतेच्या लाटेमुळे मान्सून वेळेवर येईल

विदर्भाशिवाय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही तापमान वाढण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. हवामान तज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, भरपूर पाणी पिण्याचा आणि जनावरांना वेळेवर पाणी देत ​​राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. देशातील इतर अनेक राज्यांमध्ये उष्णतेची हलकी लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या राज्यांमध्ये गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ आणि राजस्थानची नावे समाविष्ट आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com