आता निसर्गाची हाक ऐकण्याची वेळ आली आहे - मुख्यमंत्री ठाकरे

''निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य''
Cm Uddhav Thackeray
Cm Uddhav ThackerayDainik gomantak
Published on
Updated on

वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे आपल्याला विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामूळे निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते माझी वसुंधरा अभियान 2.0' या कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमावेळी बोलत होते. (Nature cannot be ignored - Chief Minister Thackeray )

वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी 'माझी वसुंधरा अभियान 2.0' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पर्यावरणात प्रत्येक घटक महत्वाचा आहे. आपण सर्वजण एक‍ टीम आहोत आणि सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर कोणताही उपक्रम कसा यशस्वी होऊ शकतो. विकास हा झालाच पाहिजे परंतु तो पर्यावरणाची जपणूक करून शाश्वततेकडे जाणारा असणे आवश्यक आहे.

मागील काही वर्षांत कमी दिवसांत अधिक पाऊस पडतोय, दरडी कोसळत आहेत. यामुळे होणाऱ्या हानीपासून पुढील पिढीचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्यक्ष पावले उचलली आहेत. त्यानुसार वसुंधरेची जपणूक नव्याने करण्याची आवश्यकता असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Cm Uddhav Thackeray
मंदिर-मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर 15 जूनला आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा

मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, विकास कशाला म्हणावे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपण निसर्ग आणि त्यातील वन्यजीव जपत पुढे आलो आहोत, यांची उपयुक्तता लक्षात घेता हा वारसा पुढे नेण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. झाडांपासून मिळणाऱ्या प्राणवायूची निकड कोविड काळात सर्वाधिक जाणवल्याचे त्यांनी सांगितले.

Cm Uddhav Thackeray
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण

मुंबईसारखी समृद्ध वन्य जीवसृष्टी असलेले शहर जगात अन्यत्र कुठेही नाही. याचा उल्लेख करून पर्यावरण रक्षणासाठी आज होत असलेल्या कामांची फळे कदाचित आता दिसणार नाही.पुढच्या पिढीला याचा निश्चित लाभ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.निसर्गाची हाक ऐकण्याची वेळ आली आहे, माझी वसुंधरा अभियान हे असेच आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे अभियान असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पर्यावरण व वातावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com