....म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्वांची माफी मागावी: फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठीचे निलंबन रद्द केले आहे. यायबत बोलताना फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisDainik Gomantak

पणजी: सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठीचे निलंबन रद्द केले. महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयाचे स्वागत केले. (Devendra Fadnavis Latest News)

Devendra Fadnavis
महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनवतयं आघाडी सरकार, फडणवीसांचा हल्लाबोल

पणजीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र (Maharashtra) सरकारचे वर्तन हे असंविधानिक आहे. जनतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्या 12 आमदारांना सरकारने निलंबित केले होते. यासाठी खोटी गोष्ट रंगवली, न घडलेले प्रसंग घडल्याचे सांगितले. मागच्या कोर्टाने त्यांना निलंबन मागे घेण्याची संधी दिली होती. मात्र, हे सरकार स्वत:ला सर्वोच्च समजते. आज सर्वोच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय चुकीचा ठरवला.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र होणार 'मास्कमुक्त'? टास्क फोर्सच्या निर्णयानंतर नवे धोरण जाहीर

फडणवीस पुढे म्हणाले, सरकारने या 12 आमदारांवर (MLA) अन्याय केला आहे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना त्यांनी विधानसभेच्या बाहेर ठेवले. हा जनतेचा देखील अपमान आहे. हे आम्हाला मान्य नाही. महाविकास आघाडी सरकारने सर्वांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्र सरकारने किराणा दुकानात वाईन विकण्याची परवानगी दिली आहे. फडणविसांनी या निर्णयाचा निषेध केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com