महाराष्ट्रत पावसाचा जोर कायम असून रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri district) राजापूर मधील जनजीवन पावसामुळे (Rain) पुन्हा विस्कळीत झाले आहे. राजापूर तालुक्यात(Rajapur taluka) रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोदवली आणि अर्जुना नदीला पुर आला आहे. येथील बाजारपेठेत (Market) पाणी शिरळे आहे. या तालुक्यातील शिवाजी चौकात पाणी शिरल्यामुळे राजापूरला पुराचा वेढा निर्माण झाला आहे.
राजापूरला दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे. येथे पावसाची संततधार सुरू असल्याने नद्यांचे पाणी पातळीत वाढ होऊन पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.
दरम्यान ,या पावसामुळे सुखनदी, निर्मला, तिलारी, तेरेखोल या नद्या भरुन गेल्या आहेत. त्यामुळे नदीकाठ राहणाऱ्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामाला आता वेग आला आहे. सिंधुदुर्गमध्ये 16 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.