'आधी संप मागे घ्या तरच चर्चा होणार': मंत्री अनिल परब

आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करत म्हटले की, आधी संप मागे घ्या तरच चर्चा होणार असल्याचे म्हटले आहे.
Anil Parab
Anil ParabDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात मागीला काही दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी महामंडळांच्या कर्मचाऱ्यांचा उग्र रुप धारण करत आहे. यातच आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करत म्हटले की, आधी संप मागे घ्या तरच चर्चा होणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसटी (ST) कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीचा निर्णय नारायण राणे यांच्या कारकिर्दीत घेतला नाही त्यामुळे त्यांची पोट दुःखी होत आहे. अशी टीका महाराष्ट्रचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना सगळ्या शब्दांची चांगली ओळख आहे. मंत्री (Minister) पदाचा वापर करून कलेक्शन कसं करायचं आणि त्रास देऊन त्यांना कस लुबाडायचे हा अनुभव नारायण राणे यांच्या पाठीशी आहे.

Anil Parab
एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार नरमले, महागाई भत्त्यात वाढ...

नारायण राणे यांचे संपूर्ण लक्ष हे सी वल्डमध्ये गुंतलेले आहे. सी वल्ड फक्त करायचा 300 एकरमध्ये 1400 एकर जमीन खरेदी करून नातेवाईकांच्या नावावर हॉटेल (Hotel) उभी करायची हा धंदा नारायण राणे यांचा होता. हे करण्यापासून ते दूर गेलेले नाहीत. तसेच हा त्यांचा प्रयत्न चालूच रहाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत वायंगणी, तोंडवळीमध्ये गाव उदवस्त करून सी वल्ड होणार नाही. नानार रिफायनरी बाबत नारायण राणे यांना याबाबत काहीतरी वाटावे. नानार रिफायनरी होता कामा नये म्हणून संपूर्ण देवगडमधून (Devgad) गाड्याच्या गाड्या भरून मोर्चे काढले होते. त्यावेळी भाजप सरकारवर टीका देखील केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com