Maharashtra: मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी आमच्यावर आरोप -आदित्य ठाकरे

Maharashtra: AU म्हणजे कोण हे स्पष्ट झाले पाहिजे,अशी मागणी राहुल शेवाळेंनी केली आहे.
आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेDainik Gomantak
Published on
Updated on

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. सभेमध्ये राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीला AUचे ४४ कॉल आले होते. हे AU म्हणजे कोण हे स्पष्ट झाले पाहिजे,अशी मागणी राहुल शेवाळेंनी केली आहे.

त्याचबरोबर, AU म्हणजे आदित्य ठाकरे असे सूचक विधान केले आहे.आदित्य ठाकरेंनी याबद्दल बोलताना, मुख्य विषयांपासून विचलित करण्यासाठी त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी आमच्यावर असे घाणेरडे आरोप केले जात आहेत असे म्हटले आहे. विरोधी पक्षाला सभेत बोलण्याची संधी दिली जात नाही, माईक बंद केले जातात. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde ) बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत, त्यांनी पद रिकामे केले पाहिजे. त्याचबरोबर, जे राज्यपाल सतत महापुरुषांचा अपमान करतात त्यांना सुद्धा राज्याबाहेर जायला हवे. अशा मागण्या आम्ही विधानसभेत केल्या आहेत असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

आदित्य ठाकरे
Sanjay Raut on Karnataka: जसा चीन भारतात घुसला तसेच आम्ही कर्नाटकात घुसू

मुख्यमंत्र्यांचे 110 कोटीच्या नागपुर भूखंड घोट्याळ्यात नाव समोर आले आहे , त्यांना वाचवण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. राहुल शेवाळेंचे लग्न कसे टिकवले हे ठाकरे घराण्याला माहित आहे. ज्यांची निष्ठा घरच्यांशी नसते त्यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे असेही आदित्य ठाकरेंनी वक्तव्य केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com