Mumbai Cricket: मुंबई क्रिकेटमध्ये खळबळ! कर्णधारपदाचा राजीनामा दिला, खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिला धक्का

Ajinkya Rahane Mumbai captaincy: अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीच्या नवीन हंगामापूर्वी मुंबईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती शेअर केली आहे.
Mumbai Cricket
Mumbai CricketDainik Gomantak
Published on
Updated on

रणजी ट्रॉफीच्या नवीन हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे.

अजिंक्य रहाणेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, "मुंबई संघाचे नेतृत्व करणे आणि चॅम्पियनशिप जिंकणे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. नवीन स्थानिक हंगाम येत असल्याने, मला वाटते की नवीन कर्णधार तयार करण्याची ही योग्य वेळ आहे आणि म्हणूनच मी कर्णधारपदाची भूमिका न घेण्याचा निर्णय घेतला आहे."

Mumbai Cricket
Goa Politics: 'बाप्‍पा' पावला... तवडकर, कामतांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ; 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

त्याने पुढे लिहिले, "मी एक खेळाडू म्हणून माझे सर्वोत्तम देण्यास आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनसोबतचा माझा प्रवास सुरू ठेवण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे जेणेकरून आपण अधिक ट्रॉफी जिंकू शकू. मी या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहे."

Mumbai Cricket
Goa: स्‍मारक, मंदिरांचा विषय दुर्लक्षितच! सरकारला मिळेना जागा, प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया थंडावली

अजिंक्य रहाणे बऱ्याच काळापासून रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०२३-२४ हंगामात रणजी ट्रॉफी जिंकून ७ वर्षांचा ट्रॉफी दुष्काळ संपवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com