मुंबईसाठी 22 दिवस धोक्याचे! मुसळधार पाऊस झाल्यास अडचणी वाढणार

एकाच वेळी समुद्र भरती आणि मुसळधार पाऊस यामूळे वाढू शकतात अडचणी
Rain News
Rain News Dainik Gomantak
Published on
Updated on

पावसाळा जवळ आला की मुंबईच्या सिमेंटीकरणामूळे मुंबईची तुंबई होण्याला फारसा वेळ लागत नाही. यामुळे नालेसफाई आणि नियोजनावर वेळेत लक्ष घालणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईसह समुद्राच्या भरतीकडेही प्रशासनाला लक्ष द्यावं लागतं. यंदा जून ते सप्टेंबर महिन्यात 22 दिवस असे आहेत की, त्या दिवशी समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुसळधार पाऊस झाला तर पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Rain News
केतकी चितळेच्या अडचणीत वाढ! वादग्रस्त पोस्टप्रकरणी आणखी तीन एफआयआर

आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या डेटावरून जून, जुलै महिन्यात प्रत्येकी सहा दिवस आणि ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी पाच दिवस मोठी भरती येणार असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामूळे ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडू शकतात. यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र अनेक ठिकाणी कामं वेळेत पूर्ण न झाल्याने पाणी साचल्याचा घटना पाहायला मिळतात.

Rain News
Subhash Desai: राष्ट्रीय महत्त्वाच्या धोरणांवर केंद्र राज्यांशी सल्लामसलत करत नाही, उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा आरोप

बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले कि, जून ते सप्टेंबर या कालावधील सर्वात मोठी भरती 4 जून आणि 3 जुलै रोजी असणार आहे. “उच्च भरतीच्या वेळी, प्रशासन सतर्क असेल कारण त्याच दिवशी मुसळधार पाऊस काही भागांमध्ये दीर्घकालीन पूरास कारणीभूत ठरतो. शहराच्या संबंधित वॉर्ड अधिकार्‍यांना ड्रेनेज साफ करणे, रस्त्यांची दुरुस्ती, झाडांची छाटणी यासारखी सर्व मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत,”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com