IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवाचे कारण काय? जाणून घ्या

चेन्नई सुपर किंग्जने या मोसमाची सुरुवात पराभवाने केली आणि आतापर्यंत सलग तीन पराभवांची चव चाखली आहे.
Chennai Super Kings
Chennai Super KingsDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये पहिल्यांदाच असा प्रकार पाहायला मिळाला ज्याची कल्पना क्रिकेट चाहत्याने केली नसेल. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने या मोसमाची सुरुवात पराभवाने केली आणि आतापर्यंत सलग तीन पराभवांची चव चाखली आहे. आयपीएलच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की 4 वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मोसमातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईतील या फ्लॉप शोनंतर चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न घुमत आहे की या हंगामातील त्यांच्या चॅम्पियन संघाचे काय होणार?

Chennai Super Kings
कोण आहे वैभव अरोरा? क्रिकेटला अलविदा करण्याचा घेतला होता निर्णय

आयपीएल 2022 (IPL 2022) सुरू होण्याच्या काही दिवस आधी चेन्नई सुपर किंग्ज संघाची कमान रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आली होती. यासह चेन्नईतील धोनी युगाचा अंत झाला. जडेजाची कर्णधारपदी नियुक्ती झाल्याने प्रत्येकजण हैराण झाला होता आणि धोनीचा वारसा पुढे चालवता येईल का, हा एकच प्रश्न होता. पहिल्याच सामन्यात जडेजाचे कर्णधारपद मोठे आव्हान ठरत असल्याचे स्पष्ट झाले. कोलकाता विरुद्धच्या मोसमातील पहिल्या सामन्यात जडेजाने कर्णधार म्हणून मैदानात उतरले पण नेहमीप्रमाणे धोनी (Mahendra Singh Dhoni) क्षेत्ररक्षकांना सूचना देताना दिसला.

हे दृश्य पाहून असे वाटले की, कर्णधार असूनही जडेजा धोनीसमोर उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. चेन्नईच्या कर्णधाराची पातळी गाठण्यासाठी जडेजाला खूप मोठा पल्ला गाठावा लागेल, असा एकच संदेश गेला. एवढेच नाही तर या हंगामात आपल्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पंड्यासारख्या अन्य युवा कर्णधारांकडून जडेजाला शिकण्याची गरज आहे.

चेन्नई सुपर किंग्सने IPL 2022 च्या मेगा लिलावात दीपक चहरला त्यांच्या संघात समाविष्ट करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि शेवटी 14 कोटी रुपये खर्च करून भारतीय वेगवान गोलंदाजाला त्यांच्या संघात घेण्यास यश मिळविले.

मात्र, चेन्नईचा हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही आणि दुखापतीमुळे गोलंदाज दीपक चहरला आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर व्हावे लागले. दीपक चहर कधी तंदुरुस्त होईल आणि कोणत्या सामन्यातून तो आपल्या संघाची सेवा करू शकेल, यावर सस्पेंस कायम आहे. चहर संपूर्ण मोसमातूनही बाहेर असू शकतो, असेही बोलले जात आहे. चहर हा पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये चेन्नईसाठी बराच काळ सर्वात प्रभावी गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत चेन्नईला लवकरात लवकर दीपक चहरच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा लागेल अन्यथा हा हंगाम हाताबाहेर जाईल, असे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com