WI vs IND, 2nd ODI: वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं, दुसऱ्या वनडेत भारत पराभूत

India vs West Indies: दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने भारताला पराभवाचा धक्का देत मालिकेत बरोबरी साधली.
India vs West Indies
India vs West IndiesDainik Gomantak
Published on
Updated on

West Indies won by 6 Wickets against India in 2nd ODI: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोस येथील ब्रिजटाउनमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानात खेळवला गेला. शनिवारी (29 जुलै) झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.

त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्याचमुळे 1 ऑगस्टला होणारा तिसरा वनडे सामना निर्णायक ठरणार आहे.

या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 182 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग वेस्ट इंडिजने 36.4 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला.

India vs West Indies
WI vs IND, 2nd ODI: इशान किशनची शानदार हॅट्ट्रिक, शुभमनने पुन्हा केली निराशा

वेस्ट इंडिजकडून ब्रेंडन किंग आणि काईल मेयर्स या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली. पण त्यांच्या 53 धावांच्या भागीदारीनंतर लगेचच दोघांनाही 9 व्या षटकात शार्दुल ठाकूरने माघारी धाडले. मेयर्सचा झेल 36 धावांवर उमरान मलिकने घेतला. तसेच ब्रेंडन किंग पायचीत झाला.

त्यानंतर अलिक अझानाझ आणि कर्णधार शाय होपने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अथानाझ 6 धावा करून 13 व्या षटकात शार्दुल ठाकूरच्याच गोलंदाजीवर बाद झाला. त्यापाठोपाठ 17 व्या षटकात शिमरॉन हेटमायरला कुलदीप यादवने 9 धावांवर त्रिफळाचीत केले. पण नंतर केसी कार्टीने कर्णधाराला दरमदार साथ दिली.

शाय होप आणि केसी कार्टीने पाचव्या विकेटसाठी 91 धावांची नाबाद भागीदारी केली आणि वेस्ट इंडिजला विजयही मिळवून दिला. होपने या भागीदारी दरम्यान अर्धशतकही झळकावले. त्याने 80 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 63 धावांची खेळी केली. तसेच केसी कार्टी 65 चेंडूत 4 चौकारांसह 48 धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून शार्दुल ठाकूरने 8 षटकात 42 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 8 षटकात 30 धावांत 1 विकेट घेतली. अन्य गोलंदाजांना विकेट्स घेतला आली नाही.

India vs West Indies
WI vs IND, 1st ODI: 'माझ्या पदार्पणावेळी...', रोहितने 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचं सांगितलं खरं कारण

तत्पुर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताकडून इशान किशन आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी 90 धावांची भागीदारीही रचली. पण त्यांची भागीदारी गुडाकेश मोतीने तोडली. त्याने शुभमन गिलला 34 धावांवर बाद केले.

त्यानंतर लेगचच अर्धशतक करणारा इशान किशनला रोमारिओ शेफर्डने बाद केले. इशानने 55 चेंडूत 55 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. हे दोघेही बाद झाल्यानंतर मात्र भारतीय फलंदाजांच्या नियमित अंतराने विकेट्स गेल्या. या डावादरम्यान अनेकदा पावसाचाही अडथळा आला होता.

दरम्यान इशान आणि शुभमननंतर केवळ सूर्यकुमार यादवला 20 धावांचा टप्पा पार करता आला. सूर्यकुमारने 24 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताचा डाव 40.5 षटकात सर्वबाद 181 धावांवर संपुष्टात आला.

वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच अल्झारी जोसेफने 2 विकेट्स घेतल्या, तर जेडेन सील्स आणि यानिक कॅरिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com