भारत विरुध्द इंग्लंड मालिकेपासून WTC च्या दुसऱ्या स्पर्धेला सुरुवात

आयसीसीचे सीइओ ज्यौफ अलार्डिस यांनी गुणप्रणालीमध्ये बदल करण्यात आला असून,कसोटी सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघाला 6 गुण देण्यात येणार आहेत.
WTC च्या दुसऱ्या स्पर्धेला सुरुवात 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार
WTC च्या दुसऱ्या स्पर्धेला सुरुवात 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार Dainik Gomantak

दुसऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेची घोषणा आयसीसीकडून (ICC) करण्यात आली आहे. या दुसऱ्या सत्रात सामना जिंकल्यानंतर जिंकणाऱ्या संघाला 12 गुण देण्यात येणार आहेत. या दुसऱ्या सत्राची सुरुवात भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून होणार आहे.

कसोटी सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघाला 6 गुण तर मालिका ड्रॉ राहिल्यास दोन्ही संघांना 4-4 गुण देण्यात येणार आहेत. आयसीसीचे सीइओ ज्यौफ अलार्डिस यांनी गुणप्रणालीमध्ये बदल करण्यात येतील असे या आधीच माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

WTC च्या दुसऱ्या स्पर्धेला सुरुवात 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार
WTC Final: अंतिम सत्रात मी बराचवेळ बाथरूममध्येच लपलो: काईल जेमिसन

4 ऑगस्टला भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका सुरु होत आहे. त्यावेळी याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रत्येक मालिकेचे समान 120 अंक असतील मग ती 2 सामन्यांची असो वा 5 सामन्यांची पुढील सत्रात प्रत्येक सामना समान गुणांचा होईल. संघांनी जिंकलेल्या सामन्यातून त्यांना मिळालेल्या गुणतालिकेनुसार स्थान देण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com