IPL 2022|कोहली क्रिकेटमधून घेणार 'ब्रेक'? असे दिले विराटने उत्तर

माजी खेळाडूंच्या सल्ल्याचे करणार पालन
team india s star batsman virat kohli is ready to take a break from cricket
team india s star batsman virat kohli is ready to take a break from cricketDanik Gomantak

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. आयपीएलमध्येही त्याची खराब खेळीमुळे अनेकदा त्याला टिकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर मायकल वॉन, केविन पीटरसन आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्यावर खुद्द विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. (team india s star batsman virat kohli is ready to take a break from cricket)

team india s star batsman virat kohli is ready to take a break from cricket
IPL 2022|फायनलबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय, सामन्याच्या वेळेत बदल

असे कोहलीने सांगितले

ब्रेक घेण्याच्या प्रश्नावर विराट कोहली म्हणाला की, बरेच लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही, पण माझ्यासाठी एका व्यक्तीचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रवी भाई (रवी शास्त्री). कारण त्यांनी मला खूप जवळून पाहिले आहे. गेल्या 6 ते 7 वर्षात मी कसा खेळलो हे त्यांना माहीत आहे. आम्ही खेळलेले सर्व क्रिकेटचे सामने आणि आलेले चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे मला ब्रेक कधी घ्यावा आणि कसा घ्यावा याचा विचार करणे आवश्यक आहे.

पुढील नियोजन

आपल्या भविष्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, सध्या भारताला आशिया चषक आणि T20 विश्वचषक जिंकणे हे त्याचे ध्यैय आहे. त्यासाठी तयारी करत आहे. भारताला नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक सामना खेळायचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com