टेंशन नॉट! भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाच्या संकटावर निघाला तोडला, Super-4 साठी महत्त्वाचा निर्णय

Asia Cup 2023: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामन्यावर पावसाचे सावट आहे, त्यामुळे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak

Reserve Day added India vs Pakistan Asia Cup 2023 Super Four Match:

आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर-4 फेरीला सुरुवात झाली आहे. या फेरीत रविवारी (10 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान संघात सामना खेळवला जाणार आहे. हा सामना कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.

दरम्यान, हवामान अंदाजानुसार श्रीलंकेत येत्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. याच हवामान अंदाजामुळे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुपर-4 सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान सामना पूर्ण झाला नाही, तर 11 सप्टेंबर रोजी हा सामना पूर्ण करण्यात येईल.

India vs Pakistan
'सोशल मीडियावर दिसले, ते...' Asia Cup दरम्यान प्रेक्षकांसमोर 'त्या' कृतीबद्दल गंभीरचे स्पष्टीकरण

या स्पर्धेचे यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केले आहे की जर पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला, तर प्रेक्षकांना त्यांचे तिकीट जपून ठेवावे लागणार आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की केवळ अंतिम सामन्याशिवाय केवळ भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामन्यासाठीच राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 17 सप्टेंबर रोजी अंतिम सामना रंगणार आहे. या अंतिम सामन्यासाठी 18 सप्टेंबर राखीव दिवस आहे.

दरम्यान, सामन्यांच्या निर्धारित दिवशीच सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, मग षटके कमी करावी लागली तरी. मात्र, तरीही सामना पूर्ण झाला नाही, तर राखीव दिवसाचा वापर करण्यात येईल.

India vs Pakistan
पाकिस्तानचे फास्ट बॉलर भारताला नडले, Asia Cup मध्ये पहिल्यांदाच घडला 'हा' विक्रम

यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक 2023 स्पर्धेतील साखळी फेरीचा सामना पावसामुळेच रद्द झाला होता. पाल्लेकेले येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा डाव पूर्ण झाल्यानंतर पावसाचा जोर वाढला.

त्यामुळे सामना पुढे खेळवला जाऊ शकला नव्हता. त्याचमुळे सामना रद्द करण्यात आला. भारताने या सामन्यात 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा केल्या होत्या.

तसेच पाल्लेकेले येथेच नेपाळविरुद्ध झालेल्या भारताच्या दुसऱ्या साखळी फेरी सामन्यादरम्यानही पावसाचा व्यत्यय आला होता. पण डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने 10 विकेट्सने जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com