Ravichandran Ashwin: धरमशाला कसोटी अश्विनसाठी ठरणार ऐतिहासिक; सचिन-कोहलीच्या क्लबमध्ये होणार सामील!

Ravichandran Ashwin: टीम इंडियाचा अनुभवी कसोटी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन एक मोठा विक्रम करण्यापासून एक पाऊल दूर आहे.
Ravichandran Ashwin
Ravichandran Ashwin Dainik Gomantak

Ravichandran Ashwin: टीम इंडियाचा स्टार अनुभवी कसोटी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन एक मोठा विक्रम करण्यापासून एक पाऊल दूर आहे. अश्विन भारतासाठी 100 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळलेल्या खेळाडूंच्या यादीत सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. धरमशाला येथे इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना खेळताच अश्विनचे ​​नाव सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या महान खेळाडूंच्या क्लबमध्ये जोडले जाईल. आत्तापर्यंत 99 कसोटी सामने खेळलेला अश्विन धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळणार आहे.

खास क्लबमध्ये अश्विनचा समावेश होणार

दरम्यान, केवळ काही खेळाडूंनी भारतासाठी 100 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. अश्विनने धरमशाला कसोटी सामना खेळल्यास 100 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळणारा तो 14 वा भारतीय क्रिकेटपटू ठरेल. सचिन तेंडुलकरने भारतासाठी सर्वाधिक 200 कसोटी खेळल्या आहेत. अश्विन हा भारताकडून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. सध्याच्या कसोटी मालिकेत भारतासाठी सर्वात जलद 500 बळी घेणारा तो भारतीय ठरला. अनिल कुंबळे भारताकडून सर्वाधिक 610 बळी घेणारा गोलंदाज आहे. या यादीत अश्विन 507 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.

Ravichandran Ashwin
R Ashwin 5 Wickets: अर्ध्या इंग्लंड संघाला माघारी धाडत अश्विनची कुंबळेशी बरोबरी, आता नजर वॉर्न-हॅडलीच्या विक्रमावर

भारतासाठी 100 कसोटी सामने खेळलेले खेळाडू

सचिन तेंडुलकर - 200 सामने

राहुल द्रविड - 163 सामने

व्हीव्हीएस लक्ष्मण - 134 सामने

अनिल कुंबळे - 132 सामने

कपिल देव - 131 सामने

सुनील गावसकर - 124 सामने

दिलीप वेंगसरकर - 116 सामने

सौरव गांगुली - 113 सामने

विराट कोहली - 113 सामने

इशांत शर्मा - 105 सामने

हरभजन सिंग - 103 सामने

चेतेश्वर पुजारा - 103 सामने

वीरेंद्र सेहवाग - 103 सामने

Ravichandran Ashwin
R Ashwin: 'दिग्गज...! अभिनंदन मित्रा', प्रतिस्पर्धी लायनला 500 विकेट्सबद्दल अश्विनच्या स्पेशल शुभेच्छा

चौथ्या कसोटीत अश्विनने 5 विकेट घेतल्या

दुसरीकडे, रांची येथे झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अश्विनने दुसऱ्या डावात पाच बळी घेत इंग्लंडला 145 धावांत गुंडाळले आणि भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र संघाने पाच विकेट राखून विजय मिळवला. अश्विनने सध्याच्या कसोटी मालिकेत अनेक विक्रम मोडीत काढले. अश्विन कोणत्याही संघाविरुद्ध 1000 धावा आणि 100 बळी घेणारा पहिला भारतीय ठरला. अनिल कुंबळेला मागे टाकत अश्विन भारतात खेळताना सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com