World Cup 2023: 'विराटची विकेट समाधान देणारीच...', प्रेक्षकांना शांत करण्याबद्दल कमिन्स बोललाच

Pat Cummins on Virat Kohli Wicket: विराट कोहलीच्या विकेटबद्दल पॅट कमिन्सने वर्ल्डकप जिंकल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
Pat Cummins - Virat Kohli
Pat Cummins - Virat Kohli

Pat Cummins on Virat Kohli's Wicket During India vs Australia in ICC ODI Cricket World Cup 2023 Final:

ऑस्ट्रेलियाने रविवारी (19 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळताना जिंकले. ऑस्ट्रेलियाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभूत केले आणि विजेतेपदावर हक्क सांगितला.

दरम्यान, या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीची विकेटही ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची ठरली होती. तो यंदाच्या स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये खेळत होता. त्यामुळे त्याची विकेट जाणे, हे भारतीय संघासाठी आणि चाहत्यांसाठी धक्का देणारे होते. त्याची विकेट कमिन्सने घेतली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून विराटने अर्धशतक केले होते. पण तो 54 धावांवर असताना त्याला कमिन्सने त्रिफळाचीत केले आणि त्याची केएल राहुलबरोबरची 67 धावांची भागीदारीही मोडली. त्यामुळे 1 लाखाहून अधिक आसन क्षमता असलेल्या अमहमदाबादच्या स्टेडियममध्ये शांतता पसरली होती.

Pat Cummins - Virat Kohli
भारताला पराभूत करत World Cup जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने असं केलं ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशन, पाहा Video

दरम्यान, हा क्षण समाधान देणारा होता, असे कमिन्सने सामन्यानंतर म्हटले आहे. खरंतर कमिन्सने या सामन्यापूर्वी म्हटले होते की 'स्पर्धा भारतात होत आहे, त्यामुळे सहाजिकच अंतिम सामन्यासाठी भारतीय चाहते मोठ्या प्रमाणात स्टेडियममध्ये असतील. पण इतक्या मोठ्या प्रेक्षक संख्येला शांत करण्यापेक्षा मोठा आनंद नसेल. हेच आमचे उद्दिष्ट आहे.'

विशेष म्हणजे कमिन्सने त्याचा शब्द राखला होता. याबद्दल सामन्यानंतर कमिन्स म्हणाला, 'प्रेक्षकांमधील शांतता स्विकारण्यसाठी विराटची विकेट गेल्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा हडल (गोलाकार एकत्र येऊन चर्चा) केले.'

'विराट आजही शतक करेल, असं वाटत होतं, जसे तो सध्या सहज करत आहे. त्यामुळे ती विकेट खूप समाधान देणारी होती.'

Pat Cummins - Virat Kohli
World Cup 2023: 'निकाल आमच्या बाजूने लागला नाही, पण...', भारताच्या पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

दरम्यान, विराटची विकेट गेल्यानंतर केएल राहुल देखील 66 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचा डाव झटपट 240 धावांत संपला. 50 षटकात भारताने सर्व विकेट्स गमावल्या. विराट आणि राहुलपूर्वी रोहित शर्माने 47 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि ऍडम झम्पाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 47 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्युशेन यांनी 192 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवले. हेडने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांसह 137 धावांची खेळी केली. लॅब्युशेन 110 चेंडूत 4 चौकारांसह 58 धावांवर नाबाद राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com