IND vs ENG, 5th Test: धरमशालेच राहणार फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व? कसे आहेत खेळपट्टीचे अंदाज

Dharamsala Pitch: भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाचवा कसोटी सामना धरमशाला येथे होणार आहे. या सामन्यात खेळपट्टी कशी असेल, याबद्दल सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.
India vs England 5th Test Dharamsala
India vs England 5th Test DharamsalaAFP

India vs England 5th test in Dharamsala pitch report

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा सामना धरमशाला येथे होणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणारा हा सामना ७ मार्च रोजी सुरू होणार आहे. दरम्यान, भारताने मालिका आधीच जिंकली जरी असली, तरी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचा भाग असल्याने या सामन्याला त्यादृष्टीने महत्त्व आहे.

दरम्यान, पाचव्या कसोटीला सुरूवात होण्यापूर्वी धरमशाला येथे अवकाळी पाऊस पडत आहे, तसेच थंडीचीही लाट आहे. त्याचमुळे सध्या तेथील वातावरण सामन्यादरम्यान कसे असेल त्याचा खेळपट्टीवर काही परिणाम होणार आहेत की नाही, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

India vs England 5th Test Dharamsala
IND vs ENG: फक्त 2 विकेट्स अन् अँडरसन 'हा' पराक्रम करणारा बनेल जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज

खरंतर धरमशाला येथील वातावरणामुळे बऱ्याचदा वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. परंतु, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार या सामन्यासाठी फिरकीला मदत करणारी खेळपट्टी तयार करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या मैदानाच्या क्युरेटरने भारताचा कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि भारतीय संघव्यवस्थापनेबरोबर बराच वेळ चर्चा केली आहे. दोन दिवसात खेळपट्टीचा स्वभाव बदलणे कठीण आहे. परंतु, त्यावर किती गवत ठेवले जाणार आणि त्याला कधी पाणी घातले जाणार यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत.

दरम्यान पावसामुळे ग्राऊंडस्टाफला खेळपट्टी तयार करताना बऱ्याचदा अडथळा आला आहे. परंतु, अद्याप सामन्याला एक दिवस असल्याने त्यावर काम केले जाऊ शकते. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार धरमशाला येथील सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे येथील खेळपट्टी स्लो टर्नर बनवली असल्याचे म्हटले जात आहे.

India vs England 5th Test Dharamsala
IND vs ENG: धरमशालेत अश्विन-जयस्वाल रचणार इतिहास? दिग्गजांना मागे टाकत नवे विक्रम करण्याची संधी

भारतीय संघ धरमशाला येथे आत्तापर्यंत केवळ एक कसोटी सामना खेळला आहे. भारताने ऑस्ट्रेलियविरुद्ध 2017 साली कसोटी सामना खेळला होता. ज्यात भारताने विजय मिळवला होता.

या एकमेव कसोटीत एकूण 32 विकेट्स गेल्या होत्या. त्यातील 2 विकेट्स धावबादच्या स्वरुपात गेल्या होत्या, तर 12 विकेट्स वेगवान गोलंदाजांनी आणि 18 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या.

भारतीय संघाने जिंकली कसोटी मालिका

इंग्लंडने हैदराबादला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. परंतु, नंतर भारताने पुनरागमन करत दुसरा, तिसरा आणि चौथा कसोटी सामना जिंकून मालिकाही खिशात टाकली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com