Virat Kohli: अनुष्काच्या पोस्टनंतर विराटच्या आजारपणाबद्दल अक्षर पटेलने दिली अपडेट, म्हणाला...

अहमदाबाद कसोटीत विराट कोहलीने शतक केल्यानंतर तो आजारी असल्याचे अनुष्का शर्माने तिच्या पोस्टमधून सांगितले होते, याबद्दल अक्षर पटेलने महत्त्वाची माहिती दिली आहे.
Virat Kohli Century
Virat Kohli CenturyDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli Century: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाखेर आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यामध्ये फलंदाजांचे वर्चस्व पहिल्या चारही दिवशी दिसून आले.

चौथ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 571 धावांचा डोंगर उभा करत 91 धावांनी आघाडी घेतली. भारताकडून तिसऱ्या तिवशी या डावात शुभमन गिलने 128 धावांची खेळी केली होती. त्यानंतर चौथ्या दिवशी विराट कोहलीने 186 धावांची मॅरेथॉन खेळी केली. त्याला अक्षर पटेलकडून चांगली साथही मिळाली.

या डावात विराट आणि अक्षर यांच्यात 6 व्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारीही झाली. पटेलने 79 धावांची खेळी केली.

Virat Kohli Century
Virat Kohli: मास्टर-ब्लास्टरपेक्षा 14 डाव कमी खेळत कोहलीनं केला 'हा' विराट पराक्रम, गावसकरांचीही बरोबरी

अनुष्काने सांगितले विराट आहे आजारी

दरम्यान, विराटने त्याचे शतक केल्यानंतर अनुष्काने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने विराटचा फोटो शेअर करताना लिहिले होते, 'आजारपणातही या शांत राहत खेळला, मला नेहमीच तू प्रेरणा देतो.' तिच्या या पोस्टनंतर तो आजारी असल्याचे सर्वांना कळाले होते.

Anushka Sharma Instagram Story
Anushka Sharma Instagram StoryInstagram

अक्षरने सांगितले त्याला याबद्दल माहितीच नाही

या सामन्याच्या चौथ्या दिवसानंतर झालेल्या पत्रकार परिषदेबद्दल विराट आजारी आहे का असे अक्षरला विचारले. त्यावेळी अक्षर हसत म्हणाला, 'मला माहित नाही. तो ज्याप्रकारे एकेरी-दुहेरी धावा घेत होता, त्यावरून तो आजारी असल्याचे वाटत नव्हते. या उष्ण वातावरणात त्याने इतकी मोठी भागीदारी केली. तो धावलाही चांगला. त्याच्याबरोबर फलंदाजी करताना मजा आली.'

Virat Kohli Century
Virat Kohli: 'शतकांचा अमृत महोत्सव', विराटने 186 धावा ठोकताच भन्नाट मीम्स व्हायरल

विराटचे 3 वर्षींनी कसोटी शतक

विराटचे हे कसोटी क्रिकेटमधील 28 वे शतक असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक ठरले आहे. विशेष म्हणजे त्याने 1205 दिवसांनी कसोटीत शतक केले आहे. त्याने यापूर्वी 27 वे कसोटी शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध कोलकाता कसोटीत केले होते. त्यानंतर आता तब्बल 3 वर्षांनी विराटला कसोटी शतक करण्यात यश आले.

दरम्यान, विराट 75 आंतरराष्ट्रीय शतक करणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतरचा दुसराच खेळाडू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com