IND vs SA: विराट सेना दक्षिण आफ्रिकेत रचणार इतिहास; माजी प्रशिक्षकांचा दावा

भारतीय संघ (Team India) सोमवारपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात करणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे.
Team India

Team India

Dainik Gomantak

Published on
Updated on

भारतीय संघ सोमवारपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात करणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. यावेळी टीम इंडियाला (Team India) इतिहास रचण्याची संधी आहे. भारताने आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकलेली नाही. मात्र यावेळी तसे होईल, असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी व्यक्त केला आहे. शास्त्री म्हणाले, दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीवर पराभूत करणे कधीही सोपे नव्हते परंतु विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात रविवारपासून सुरु होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयाची नोंद करण्याची क्षमता आहे.

दरम्यान, शास्त्री यांचा कार्यकाळ नुकताच टी-20 विश्वचषकाने (T20 World Cup) संपला. भारतीय संघाला सदैव पाठिंबा देत राहीन, असंही ते म्हणाले. शास्त्रीही कोहलीच्या अगदी जवळचे मानले जातात. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या (Australia) इतिहासाची दक्षिण आफ्रिकेत पुनरावृत्ती व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. आगामी मालिकेबद्दल बोलताना शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले, “भारतीय संघाला आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी मिळू शकली नसती. विराट कोहली (virat kohli) एक महान कर्णधार असून त्याच्याकडे प्रतिभावान संघ आहे.

<div class="paragraphs"><p>Team India</p></div>
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, 'या' तुफानी गोलंदाजाने मालिकेतून घेतली माघार !

टीम इंडियामध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवण्याची ताकद

शास्त्री म्हणाले, 'आम्ही अजून दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकलेली नाही. दक्षिण आफ्रिकेला त्याच्या भूमीवर पराभूत करणे सोपे नसून आपल्याकडे पुरेशी संसाधने आहेत हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. नेहमीप्रमाणेच भारतीय संघाला माझा पूर्ण पाठिंबा असेल. पहिली कसोटी सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर खेळवली जाईल. दुसरा आणि तिसरा कसोटी सामना अनुक्रमे जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथे खेळवला जाईल.' त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. भारताने 1992 मध्ये डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (south africa) पहिला कसोटी सामना खेळला होता, तर संघाने 2006 मध्ये तेथे पहिला कसोटी सामना जिंकला होता, राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांनी अलीकडेच मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्रीची जागा घेतली होती.

याआधीही रवी शास्त्रींनी टीम इंडियाचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते, 'माझ्या मते गेल्या पाच वर्षात जर कोणता संघ कसोटी सामन्याचा राजदूत झाला असेल तर तो भारतीय क्रिकेट संघ आहे. विराट कोहलीला कसोटी क्रिकेट आवडते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com