IND vs BAN: बांग्लादेश सीरीज संपताच 'या' खेळाडूचीही कारकीर्द संपणार!

IND vs BAN 2nd Test: टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकून या दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी कायम ठेवली आहे.
India Test Team | IND vs BAN 2nd Test
India Test Team | IND vs BAN 2nd TestDainik Gomantak

India vs Bangladesh 2nd Test: भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकून या दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी कायम ठेवली आहे. ढाका येथील शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने बांगलादेशचा दुसरा डाव 231 धावांत गुंडाळला. त्यामुळे यजमानांनी भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य दिले. तिसऱ्या दिवसापर्यंत टीम इंडियाच्या फक्त 4 विकेट पडल्या होत्या. दरम्यान, असाही एक खेळाडू आहे, जो सलग मालिकेत फ्लॉप ठरला. आता त्याला संघात स्थान राखणे कठीण होणार आहे.

केएल राहुल पुन्हा फ्लॉप झाला

मिरपूर कसोटीच्या दोन्ही डावात कर्णधार केएल राहुल फ्लॉप ठरला. तो दुसऱ्या डावात अवघ्या 2 धावा करुन शकिब अल हसनचा बळी ठरला. डावाच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो विकेटच्या मागे नुरुल हसनकरवी झेलबाद झाला. राहुलला या चेंडूचा बचाव करायचा होता, पण तो नीट समजू शकला नाही आणि बाद झाला. पहिल्या डावात त्याला 45 चेंडूत केवळ 10 धावा करता आल्या होत्या. अशा स्थितीत दोन्ही डावात त्याच्या बॅटमधून एकूण 12 धावा निघाल्या.

संपूर्ण मालिकेत बॅटने फसवणूक केली

बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) या संपूर्ण मालिकेत केएल राहुल धावा करण्यासाठी झगडत आहे. गेल्या सामन्यात त्याने दोन्ही डावात एकूण 45 धावा केल्या होत्या. एकदिवसीय मालिकेतही त्याने शेवटच्या दोन सामन्यात 8 आणि 14 धावा केल्या. त्याचवेळी, त्याने मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात 73 धावांची खेळी केली, जी त्याची 5 सामन्यांमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

AUS विरुद्धच्या मालिकेत अडचणी वाढतील

राहुलच्या सततच्या खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मायदेशातील मालिकेत प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळवणे त्याच्यासाठी सोपे असणार नाही. रोहित शर्मा संघात परतल्यावर सलामीची जबाबदारी घेईल हे आणखी एक कारण आहे. राहुलच्या फ्लॉप-शोमुळे शुभमन गिलची जागा निश्चित होऊ शकते. अशा परिस्थितीत नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड हा मोठा निर्णय घेऊ शकतात.

भारताला 145 धावांचे लक्ष्य मिळाले आहे

शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा पहिला डाव 227 धावांत गुंडाळला. यानंतर टीम इंडियाने (Team India) पहिल्या डावात 314 धावा केल्या. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात केवळ 231 धावा करु शकला. सामना आता रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. भारताला अजून 100 धावा करायच्या आहेत तर 6 विकेट्स बाकी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com