IND vs NED: भारतीय फलंदाजांची आतिषबाजी! 48 वर्षांच्या वर्ल्डकपमध्ये कोणालाच न जमलेला केला पराक्रम

World Cup 2023: भारतीय फलंदाजांनी नेदरलँड्सविरुद्ध वर्ल्डकप 2023 मध्ये खेळताना मोठा विश्वविक्रम नावावर केला आहे.
KL Rahul, Rohit Sharma, Shreyas Iyer, Shubman Gill, Virat Kohli
KL Rahul, Rohit Sharma, Shreyas Iyer, Shubman Gill, Virat KohliBCCI
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Netherlands:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स संघात रविवारी (12 नोव्हेंबर) अखेरचा साखळी सामना खेळवला जात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताने नेदरलँड्ससमोर 411 धावांचे आव्हान दिले आहे.

या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी मोठा विश्वविक्रम केला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम दर्शनी या निर्णयाचा भारतीय फलंदाजांनी चांगला फायदा उचलला.

KL Rahul, Rohit Sharma, Shreyas Iyer, Shubman Gill, Virat Kohli
World Cup 2023: जो रुटने रचला इतिहास, वर्ल्ड कपमध्ये 'ही' कामगिरी करणारा बनला पहिला इंग्लिश फलंदाज

भारताकडून पहिल्या पाचही फलंदाजांनी 50 धावांचा टप्पा पार केला. त्यामुळे 48 वर्षांच्या वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले की पहिल्या पाचही फलंदाजांनी 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच वनडे क्रिकेटच्या इतिहासात केवळ तिसऱ्यांदाच अशी घटना घडली.

यापूर्वी ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध दोनवेळा असा कारनामा केला आहे. ऑस्ट्रेलियाने 2013 साली जयपूरला आणि 2020 मध्ये सिडनीमध्ये खेळताना हा कारनामा केला होता. या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या पाचही फलंदाजांनी 50 धावांचा टप्पा ओलांडला होता.

KL Rahul, Rohit Sharma, Shreyas Iyer, Shubman Gill, Virat Kohli
World Cup 2023: श्रेयस-केएल राहुलचा शतकी दणका, तर चौघांची फिफ्टी! भारताचे नेदरलँड्सला 411 धावांचे लक्ष्य

दरम्यान, भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीवीरांनी शतकी भागीदारी करण्याबरोबरच वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली. रोहितने 54 चेंडूत 61 धावांची खेळी केली, तर शुभमनने 32 चेंडूत 51 धावांची खेळी केली.

तसेच तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या विराट कोहलीने 56 चेंडूत 51 धावा केल्या. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केलेल्या श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या दोघांनीही शतकाला गवसणी घातली. त्यांनी द्विशतकी भागीदारीही केली. त्यांच्यामुळे भारताला 400 धावांचा टप्पा पार करता आला.

श्रेयसने 94 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकारांसह 128 धावांची नाबाद खेळी केली. तर केएल राहुलने 64 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांसह 102 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 50 षटकात 4 बाद 410 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com