Asia Cup Final: सिराजने श्रीलंकेला नाचवले! भारतासमोर चॅम्पियन बनण्यासाठी 51 धावांचे आव्हान

IND vs SL Final: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने विजयासाठी भारतासमोर माफक ५१ धावांचे आव्हान ठेवले आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Asia Cup Final 2023 India need 51 runs to win against Sri Lanka :

आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (17 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळवला जात आहे. आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 51 धावांचे आव्हान ठेवले आहे.

श्रीलंकेचा संघ 15.2 षटकात 50 धावावंर सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने 6 विकेट्स घेतल्या. यातील चार विकेट्स त्याने चौथ्याच षटकात घेतल्या.

Team India
W,0,W,W,4,W...! सिराजच्या वेगाने लंकेची दाणादाण, भारतीय क्रिकेट इतिहासात कोरलं सुवर्णाक्षरांनी नाव

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्रीलंकेकडून पाथम निसंका आणि कुशल परेरा सलामीला फलंदाजीला आले होते. पण पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर परेराला जसप्रीत बुमराहने शुन्यावर बाद केले.

त्यानंतर मात्र, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकन फलंदाजांची भंबेरी उडाली. चौथ्या षटकात सिराजने तब्बल चार विकेट्स घेतल्या. त्याने या षटकात पाथम निसंकाला (2) पहिल्या चेंडूवर, सदिरा समरविक्रमाला (0) तिसऱ्या चेंडूवर, चरिथ असलंकाला (0) चौथ्या चेंडूवर आणि धनंजय डी सिल्वाला (4) सहाव्या चेंडूवर बाद केले.

त्यामुळे श्रीलंकेची अवस्था 5 षटकात 12 धावात 5 विकेट्स अशी झाली होती. त्यातून श्रीलंकेचा संघ सावरु शकला नाही. विशेष म्हणजे सहाव्या षटकात कर्णधार दसून शनकालाही शुन्यावर सिराजने माघारी धाडले.

Team India
IND vs SL Final: श्रीलंकेने जिंकला 'टॉस', विराट-बुमराहसह 'या' 5 खेळाडूंचे टीम इंडियात पुनरागमन; पाहा प्लेइंग-11

यानंतर 12 व्या षटकात संयमी खेळणाऱ्या कुशल मेंडिसला सिराजनेच 17 धावांवर त्रिफळाचीत केले. 13 व्या षटकात हार्दिक पंड्याने दुनिल वेललागेला 8 धावांवर माघारी धाडले. 16 व्या षटाच्या पहिल्या दोन चेंडूवर हार्दिकने अनुक्रमे प्रमोद मदुशन (1) आणि मथिशा पाथिराना (0) यांना बाद करत श्रीलंकेचा डाव संपवला. श्रीलंकेकडून दूशन हेमंता 13 धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून मोहम्मद सिराजने 7 षटकात 21 धावांत 6 विकेट्स घेतल्या, तसेच हार्दिक पंड्याने 2.2 षटके गोलंदाजी करताना 3 धावांत 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहने 5 षटकात 23 धावा देत 1 विकेट घेतली.

आता जर भारताने 51 धावांचे आव्हान पूर्ण केले, तर भारतीय संघ आठव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद मिळवणार आहे. यापूर्वी भारताने 1984, 1988, 1991, 1995, 2010, 2016 आणि 2018 साली आशिया चषकाचे विजेतेपद जिंकले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com