Toxic Friendship: मैत्रीत 'या' गोष्टी बदलल्यास समजून जा, टॉक्सिक बनतंय नातं...

मैत्रीत काही बदल दिसल्यास वेळीच व्हा सावध
Toxic Friendship
Toxic FriendshipDainik Gomantak
Published on
Updated on

Toxic Friendship: मैत्री हे असं नातं आहे जे प्रत्येकाला प्रत्येक वयात आवश्यक असते. ज्या गोष्टी आपण आपल्या भावंडांशी, पालकांसोबत शेअर करू शकत नाही, त्या सर्व गोष्टीं आपण फक्त मित्रांसोबत शेअर करतो.

आयुष्यात मित्र असणे हा देखील एक मोठा आधार असतो. जर तुमचे चार मित्र असतील आणि काही उपयोगाचे नसतील तर यापेक्षा चांगले असू शकत नाही. शाळा, कॉलेज, ऑफिस किंवा शेजारी राहणारी कोणतीही व्यक्ती जर त्याचे/तिचे विचार तुमच्या सारखे असतील तर तो तुमचा मित्र बनू शकतो, पण कधी कधी फोन आणि फेसबुक लिस्टमध्ये असे काही मित्र असतात, ज्यांच्याशी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने भेटावेच लागते. अशा लोकांचा तुम्हाला आधार वाटत नाही, तुम्हाला त्यांच्याशी बोलणे कठीण जाते आणि त्यांच्यासोबत राहताना तुम्हाला तणाव येऊ लागतो, त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर अशा लोकांपासून दूर राहाल तितके चांगले असते.

  • एकत्र वेळ घालवणे न आवडणे

मैत्री अशा टप्प्यावर आली आहे की जेव्हा तुम्हाला एकमेकांच्या सहवासातही चांगले वाटत नाही, तेव्हा मैत्रीत अंतर ठेवा. एखाद्या मित्राला भेटताना, त्याच्याशी बोलताना किंवा त्याच्यासोबत राहताना तुम्हाला राग किंवा स्ट्रेस येत असेल तर काय उपयोग ? अशा लोकांपासून दूर राहणे चांगले.

  • मैत्री गंभीर नसणे

अनेक नाती टिकवण्यासाठी खूप अपेक्षा ठेवणं योग्य मानलं जात नाही आणि मैत्रीचं नातंही असंच काहीसं असतं. पण हीच वृत्ती दीर्घकाळ पाळल्याने काही काळानंतर गोंधळ होतो. जर तुम्ही तुमच्या मित्राला प्रत्येक गरजेच्या वेळी मदत करत असाल, नेहमी त्याच्यासाठी उभे असाल, परंतु या गोष्टी तुमच्या मित्राच्या बाजूने होत नसेल, तर अशी मैत्री टिकवून ठेवण्यात काही अर्थ नाही.

  • पझेसिव्ह असणे

जर तुमचा एखादा मित्र असेल जो तुमचे इतरांशी बोलणे किंवा त्याच्यासोबत हँग आउट करणे सहन करू शकत नाही. जर ते यावरून तुमच्याशी भांडू लागले तर लवकरात लवकर त्यांच्याशी मैत्री तोडून टाका. कारण असे लोक तुम्हाला फक्त स्ट्रेस देतात. तसेच त्यांच्यासोबत राहणे म्हणजे भीतीच्या छायेखाली जगण्यासारखे आहे.

  • विश्वास न ठेवणे

प्रत्येक नातं हे विश्वासावर आधारित असतं. मस्तीने भरलेल्या मैत्रीतही हे आवश्यक आहे. पण जर तुमचा तुमच्या मित्रावर विश्वास नसेल किंवा पूर्वी असलेली मैत्री आता काही कारणाने तुटली असेल तर अशा मैत्रीचाही काही उपयोग नाही. त्याची सुरुवात फक्त छोट्या गोष्टींपासून होते. प्रत्येक वेळी नवनवीन बहाणे काढणे यासारख्या गोष्टी मैत्रीत चांगल्या नसतात. यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांसमोर बोल्ड राहू शकत नाही.

  • बोलायचे एक आणि करायचे दुसरे

काही मित्रांच्या अशा अपेक्षा असतात की तुम्ही त्यांना सर्व काही सांगावे आणि त्यांच्या न बोललेल्या गोष्टी देखील समजून घ्याव्यात. त्यामागचा त्यांचा तर्क असा आहे की, मैत्री पक्की असेल तर अनेक गोष्टी न सांगताही समजू शकतात. पण जेव्हा त्यांच्यावर अशी वेळ येते तेव्हा हे तर्कच फेल ठरतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com