Poem: आदिम काळापासून व्यक्त होण्यासाठी वापरलेलं एक प्रभावी माध्यम म्हणजेच कविता

Poem: मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यात माणसाच्या इतर विकासाबरोबर विकास झाला तो संवाद कौशल्याचा.
Poem: आदिम काळापासून व्यक्त होण्यासाठी वापरलेलं एक प्रभावी माध्यम म्हणजेच कविता
Dainik Gomantak

Poem:

आसावरी कुलकर्णी

मा नवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यात माणसाच्या इतर विकासाबरोबर विकास झाला तो संवाद कौशल्याचा. विकसित मेंदूने निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या प्रेरणेतून संवादाची कला विकसित केली. मन, डोळे आणि कान या इंद्रियांद्वारे जे पाहिले ते व्यक्त करण्याची कला वेगवेगळ्या माध्यमातून उदयास आली.

आधी अक्षर, नंतर शब्द त्याच्या जोडीला सूर आणि त्यातून उमटलेली कविता. आदिम काळापासून व्यक्त होण्यासाठी वापरलेलं एक प्रभावी माध्यम म्हणजेच कविता. शब्द जोडत त्याची साखळी होते आणि यमक जुळले की कविता. जागतिक स्तरावर सुमेरियन कविता ही जगातील पहिली कविता अस मानण्यात येत.

भारतातील वेद, रामायण, महाभारत हेही प्राचीन कविता म्हणून मान्यता प्राप्त आहेत. किंबहुना महाभारत ही जगातील सर्वात जास्त लांबीचे काव्य अशी मान्यता आहे. संवेदनशील मनाला फुटलेले हिरवे कोंब म्हणजे कविता.

वेदनेतून उठणारा हुंकार म्हणजे कविता. स्त्रीच्या कष्टी जीवनाचे सार म्हणजे कविता. व्यवस्थे विरोधात उठवलेला बुलंद आवाज म्हणजे कविता. ऋतूचा बदल, निसर्गाची लहर म्हणजे कविता. एखाद्या घटने चा दगड मानच्या तळ्यात पडल्यानंतर उठणारे तरंग म्हणजे कविता.

Poem: आदिम काळापासून व्यक्त होण्यासाठी वापरलेलं एक प्रभावी माध्यम म्हणजेच कविता
Goa Beach: बायणा किनारी बेकायदा जलक्रीडा नको

युनेस्कोने १९९९ साली २१ मार्च हा दिवस कविता दिवस म्हणून जाहीर केला. कवितेच्या माध्यमातून पुसली जाणारी सीमा रेषा, संस्कृती यांची बंधन अधोरेखित करण्यासाठी युनेस्कोने २१ मार्च हा दिवस निवडला. यावर्षी ‘इतिहासाच्या खांद्यावरली वरात’ अशी थीम युनेस्कोने निवडलेली आहे. कवितेच्या माध्यमातून विविध संस्कृतीला जोडणाऱ्या महान कवींचे स्मरण करून त्यांना मानवंदना देणे आणि नवोदित कवींना प्रेरणा देणे असा उद्देश यामागे आहे.

निसर्गातील असलेल्या ताल सूर लयीला शब्दबद्ध करण्याची ताकद कवितेत आहे. आदिम संस्कृतीपासून लोकसंगीत, काव्य, आर्या ते आताच्या हायकू, छंदबद्ध कविता, मुक्तछंद कविते पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. झाडावरचे पिकलेले पण गळताना ते झाडावर नवीन अंकुर फुटताना कुठला तरी कवी कविता शब्दबद्ध करत असेल खात्री बाळगा!

युनेस्कोने १९९९ साली २१मार्च हा दिवस कविता दिवस म्हणून जाहीर केला. कवितेच्या माध्यमातून पुसली जाणारी सीमा रेषा, संस्कृती यांची बंधन अधोरेखित करण्यासाठी युनेस्कोने २१ मार्च हा दिवस निवडला. यावर्षी ‘इतिहासाच्या खांद्यावरली वरात’ अशी थीम युनेस्कोने निवडलेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com