Monsoon Health Care: पावसाळ्यात पाणी पितांना कोणती काळजी घ्यावी, वाचा सविस्तर

पावसाळ्यात अनेकांना पोटाच्या समस्या असतात यामुळे पाणी पितांना काळजी घेणे गरजेचे असते.
Monsoon Health Care
Monsoon Health CareDainik Gomantak
Published on
Updated on

Monsoon Health Care: पावसाळा हा उन्हापासून दिलासा देणारा असतो. पण या दिवसांमध्ये अनेक आजार देखील डोकं वर काढतात. यामुळे पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात अनेक वेळा पाणी गढूळ येते. यामळे पिण्याच्या पाण्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

आयुर्वेदात असे सांगितले आहे की, तुम्हाला जर का तुमचे आरोग्य निरोगी ठेवायचे असले तर पावसाळ्यात पोटभर पाणी पिणे गरजेचे आहे. पण पावसाळ्यात पाणी पितांना काळजी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • कोमट पाणी प्या

पावसाळ्यात अनेकांना पोटाच्या समस्या असतात. त्यामुळे दिवसभर कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसेच पाणी हे नेहमी जेवणानंतर पाणी प्यावे. जेवणापूर्वी किंवा जेवणादरम्यानच पाणी पिणे टाळावे. जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

  • स्वच्छ पाणी

पावसाळ्यात स्वच्छ पाणी पिण्यावर भर द्यावा. पिण्याचे पाणी स्वच्छ असले तरीही, तुमच्या पिण्याच्या पाण्यात नियमितपणे जिवन ड्रॉपचे दोन थेंब टाकुनच ते पाणी प्यावे.

  • तांब्याच्या भांडयातील पाणी पिणे

आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे चांगले असते. विशेषतः पावसाळ्यात तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावे. तांबे तुमच्या पिण्याच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणतात.

  • तुरटीचा वापर करावा

पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात तुरटी फिरवणे चांगले असते. त्यामुळे पाण्यातील गाळ खाली बसतो अणि नंतर ते पाणी तुम्ही पिण्याकरता घेऊ शकतात.

  • पाणी गाळून घ्यावे

पावसाळ्यात नळाचे पाणी गाळून भरावे. पावसाळ्यात नळातून येणारे पाणी अनेक वेळा गढुळ येते. यामुळे गाळून किंवा कोमट करुनच पाण्याचे सेवन करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com