
नवजात बाळांमध्ये कावीळ (Jaundice) ही एक कॉमन समस्या आहे. जन्मानंतर, बाळाचे डोळे पिवळे दिसू लागतात तेव्हा लगेच ओळखावे की, त्याच्या शरीरात बिलीरुबिन जास्त प्रमाणात तयार झाले आहे, ज्यामुळे नवजात बाळाला कावीळ होते. सहसा काही दिवसात बाळ या अजारातून बरे होते, परंतु कधीकधी हा आजार गंभीर देखील असू शकतो. अशा परिस्थितीत नवजात बाळाची काळजी घेणे गरजेचे बनते. विशेषतः पालकांनी याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. चला तर मग नवजात बाळांना कावीळ का होते ते जाणून घेऊया...
डॉ. विपिन चंद्र उपाध्याय यांनी सांगितले की, नवजात बाळामध्ये कावीळ होण्याची अनेक कारणे आहेत. यापैकी, गर्भाशयात वाढणारे बाळ पूर्णपणे विकसित न होणे. गर्भवती महिलांचे पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष ही कारणे असू शकतात.
जन्मानंतर, बाळाचे लिव्हर योग्यरित्या कार्य करण्यास सुरुवात करत नाही, ज्यामुळे शरीरात बिलीरुबिन जमा होते, त्यामुळे नवजात बाळाला कावीळ होते.
नवजात बाळामध्ये जास्त लाल रक्तपेशी तयार होतात आणि तुटतात, ज्यामुळे बिलीरुबिन वाढते. नवजात बाळामध्ये बिलीरुबिन वाढल्यास कावीळ होण्याचा धोका जास्त असतो.
जर आई आणि बाळाचे रक्तगट वेगवेगळे असतील तर अशा परिस्थितीतही कावीळ होण्याचा धोका वाढतो.
कोणताही आजार शरीरासाठी धोकादायक असला तरी, कावीळ 1-2 आठवड्यात आपोआप बरी होते. परंतु काही प्रकरणांमध्ये बाळाची स्थिती गंभीर होऊ शकते. जर शरीरात बिलीरुबिनची पातळी खूप वाढली तर ते बाळाच्या मेंदूला हानी पोहोचू शकते, ज्यामुळे मानसिक विकासात अडथळा येऊ शकतो. जर कावीळ बराच काळ राहिली तर त्याचा परिणाम लिव्हरवर होऊ शकतो.
बाळाला वारंवार स्तनपान केल्याने कावीळ लवकर बरी होते. जर मुलाला कावीळ (त्वचा किंवा डोळे पिवळे होणे) ची लक्षणे दिसली तर तात्काळ डॉक्टरांना (Doctor) दाखवा. या बाबतीत निष्काळजी राहू नका.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.