Health Care Tips: 'ही' 5 फळं खाल्यानंतर पाणी पिताय? मग ही बातमी वाचाच

फळं खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते पण त्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
Drink Water
Drink Water Dainik Gomantak
Published on
Updated on

Health Care Tips: फळं खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. फळांमध्ये खनिजे, व्हिटॅमिन, कॅल्शिअम आणि लोह यासारखे पोषक घटक असतात. फळं खातांना देखील काही नियम पाळले पाहिजे. अनेक लोक कधीही आणि कोणत्या पदार्थांसोबत फळं खातात. असे केल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. तज्ञांच्या मते फळं खाल्यानंतर पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. ही फळ कोणती आहेत हे जाणून घेऊया.

watermelon
watermelonDainik Gomantak

टरबूज

टरबुज खाल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. तज्ञांच्या मते टरबुज काल्यानंतर पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडू शकते.तसेच यामुळे लूज मोशनचा त्रासही होऊ शकतो.

Banana
BananaDainik Gomantak

केळी

केळीमध्ये पोटॅशिअम भरपुर असते. यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे आजार दूर होतात. पण केळी खाल्यानंतर पाणी पिल्यास पचनास समस्या येऊ शकतात.

Pomegranate
Pomegranate Dainik Gomantak

डाळिंब

डाळिंब खाल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. डाळिंब खाल्यावर चुकूनही पाणी पिऊ नका. कारण यामुळे मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.

Orange
Orange Dainik Gomantak

आंबट फळ

संत्री, आवळा, द्राक्षे अशी आंबट फळे खाल्ल्यानंतरही पाणी पिऊ नये. असे केल्याने शरीराची पीएच पातळी बिघडू शकते. यामुळे पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो.

Guava
Guava Dainik Gomantak

पेरू

फॉलिक अॅसिड, पोटॅशियम आणि कॉपरसह फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर असलेले पेरू खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. पण पेरू खाल्ल्यानंतर पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. यामुळे पोटा संबंधित आजार उद्भवू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com