पाणी पिणं आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, पण कोणतीही गोष्ट अति प्रमाणात घेतली तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास हायपोनेट्रेमिया होऊ शकते. ज्यामुळे शरीरातील सोडियमची पातळी कमी होते आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो.
प्रत्येकाने दिवसाला तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच जर तीन लिटर पाणी पिण्यास तुमचे शरीर सक्षम नसेल तर जास्त प्रमाणात देखील ते पिऊ नका. कधीही पाणी पिताना ते एकदम पिऊ नका, थोडे थोडे प्या. प्रौढ व्यक्तीने दिवसाला २.५ - ३.५ लिटर पाणी प्यावे. व्यक्तीच्या वजनानुसार आणि हवामानानुसार हे प्रमाण बदलू शकते.
अधिक शारीरिक श्रम, व्यायाम, किंवा गरम हवामानात पाणी जास्त लागते. मूत्राचा रंग हलका पिवळसर असेल तर शरीराला पुरेसं पाणी मिळत आहे. गडद पिवळा असेल तर पाणी वाढवावं.
अति पाणी पिणे जितके घातक आहे, तितकेच कमी पाणी पिणेही हानिकारक असते. त्यामुळे आपल्या शरीराची गरज ओळखून योग्य प्रमाणात पाणी प्यावे.
तहान लागल्यावरच पाणी प्यावे. एकदम खूप सगळं पाणी न पिता, थोड्या-थोड्या वेळाने प्यावे. व्यायाम किंवा उन्हात घाम जास्त आला तर थोडं जास्त पाणी घ्यावं. शरीराच्या गरजेप्रमाणे पाणी सेवन करणे सर्वात योग्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.