
मडगाव: दवर्ली-दिकरपालच्या सरपंचांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या दिकरपाल-दवर्ली येथील वल्लभ वरक यांनी अटक होऊ नये, म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या या अर्जावर निकाल होण्याची शक्यता आहे.
संशयित वरक यांच्याविरुद्ध मायणा - कुडतरी पोलिसांनी भान्यासं कलम ३३२ (क), ३२४ (३) व ३५२ नुसार गुन्हा नोंद केला आहे. दक्षिण गोव्याच्या पोलिस मुख्यालयाने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच श्याम राजाध्यक्ष यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची माहिती दक्षिण गोव्याच्या पोलिस मुख्यालयाने दिली होती.
याप्रकरणी पंचायत सचिव खुशालीदास गावकर यांनी मायणा - कुडतरी पोलिस स्थानकात वरक यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. वरक यांनी मडगावच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. या अर्जावर मुख्य सत्र न्यायाधीश शॅरीन पॉल यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे ॲड. जे. ठक्कर यांनी काम पाहिले. शुक्रवार, २३ मे रोजी या अर्जावर निर्णय होणार आहे.
१४ मे रोजी सकाळी ११.१५ वाजता दवर्ली पंचायत कार्यालयात संशयित वल्लभ वरक आले. त्यांनी कार्यालयातील खुर्च्या आणि इतर वस्तूंची हानी केली, असा आरोप आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.