
पणजी: राज्यात मागील दोन- तीन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी (१६ जून) सकाळपासून जोर काहीसा मंदावला असला तरी काही भागात पावसाची रिपरिप सुरूच होती. दरम्यान, पुढील दोन दिवस ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहून पाऊस पडण्याची शक्यता असून 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
गोव्यासह कोकण किनारपट्टीवर आकस्मिक पूरजन्य स्थिती देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोव्यासह सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, कर्नाटकातील उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड आणि उडपी येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
घरावर कोसळले वडाचे झाड
- वेर्ला-काणका येथे एक मोठे वडाचे झाड घरावर कोसळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरावरील सर्व कौले फुटली सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, सत्तरीतील अनेक भागात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. तीन ठिकाणी वीजखांब उन्मळून पडले.
- पर्वरी येथे श्रद्धा योग गुरुकुलाच्या कुंपणाजवळील गुलमोहराचा वृक्ष उन्मळून पडला. राज्यात पडझडीच्या घटना सुरूच आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.