Goa BJP : मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत सदानंद तानावडे यांचं सुचक वक्तव्य

मुख्यमंत्री सावंत आणि तानावडे यांनी केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या
Sadanand Tanawade
Sadanand TanawadeDainik Gomantak

Goa cabinet : राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या जोरदार चर्चा असताना भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. तूर्तास फेरबदलाची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले.

मागील आठवड्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

अर्थात त्यावेळी भाजपशासित प्रदेशांमधील अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होती आणि त्यामध्ये येणाऱ्या चार राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री पुण्याला गेल्यानंतर ते दिल्लीला गेलेत आणि मंत्रिमंडळ फेरबदलावर शिक्कामोर्तब होणार अशा चर्चांना ऊत आला होता.

Sadanand Tanawade
Mumbai-Goa Vande Bharat Express : मडगाव स्थानकात आज ‘वंदे भारत'चा होणार शुभारंभ

यासंदर्भात तानावडे म्हणाले, की राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा म्हणजे केवळ अटकळे आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत अल्पावधीतच दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर गेल्याने २ कॅबिनेट मंत्र्यांना वगळण्यात आले आणि २ काँग्रेस पक्षांतरित आमदारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते, हे फक्त अनुमान आहेत.

अशा प्रकारची कोणतीही हालचाल झाल्यास मुख्यमंत्री त्यावर निवेदन करतील, पण मी निश्चितपणे सांगू शकतो की किमान सध्या तरी मंत्रिमंडळात फेरबदल होणे शक्य नाही. मुख्यमंत्री वैयक्तिक भेटीवर दिल्लीत गेले असून त्यांनी काही केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेतली आहे, असा दावाही तानावडे यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com