.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डिचोली, प्रत्येकजण हा स्वतः आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो. याचे विद्यार्थ्यांनी भान ठेवून आपले भवितव्य घडवावे. जीवनात वेळेला अधिक महत्त्व आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री रवी नाईक यांनी केले.
शिक्षा व्हीजन, डिचोलीतर्फे आयोजित विद्यार्थी अभिनंदन सोहळ्यात नाईक प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे, हे शिक्षा व्हीजनचे महान कार्य असल्याचे गौरवोद्गारही नाईक यांनी काढले.
रविवारी मोमेन्टोज सभागृहात आयोजित या सोहळ्याला शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये, शिक्षाच व्हीजनचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, उपनगराध्यक्ष दीपा पळ, शिक्षा व्हीजनचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश आमोणकर, खजिनदार गुंजन कोरगावकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांचे अनुकरण न करता उपलब्ध संधीचा फायदा घेत आपले भवितव्य घडवावे, असे आवाहन डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले.
आतापासूनच तयारीला लागा : भगीरथ शेट्ये
नवीन शैक्षणिक धोरणामुळे येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल अपेक्षित आहे. कौशल्य विकसित करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. त्या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ उठवून येणाऱ्या काळाला समर्थपणे तोंड देण्यासाठी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन भगीरथ शेट्ये यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.