Sal Water : साळमधील पाणी, वीज समस्या सोडवा; नागरिकांची वीज, पाणी खात्यावर धडक

Sal Water : सरपंच, पंचसदस्य उतरले रस्त्यावर
Sal Water
Sal Water Dainik Gomantak
Published on
Updated on

Sal Water : डिचोली, साळ गावात विजेसह पाण्याची समस्या निर्माण झाली असून या समस्येने जनता त्रस्त झाली आहे. या समस्या सोडविण्यासाठी गावच्या सरपंचांसह पंच सदस्य आता मैदानात उतरले आहेत.

मोजक्याच नागरिकांना सोबत घेत सरपंच सौ. सावित्री घाडी आणि पंच सदस्य सौ. नीता राऊत यांनी आज वीज कार्यालयासह जलस्रोत खात्याच्या कार्यालयावर धडक दिली व वीज आणि पाणी या मुख्य गरजा पूर्ण करा, अशी मागणी केली.

यावेळी मेघ:श्याम राऊत यांच्यासह संगीता राऊत आदी महिला उपस्थित होत्या. वीज आणि पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन संबंधीत अधिकाऱ्यांनी सरपंचांसह इतरांना दिले.

सरपंच सौ. घाडी आणि पंच सदस्य सौ. राऊत यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या गटाने सर्वप्रथम वीज कार्यालयावर धडक दिली. वीज खात्याचे कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत यांची भेट घेवून त्यांच्यासमोर गावातील वीज समस्या मांडली.

अधिकाऱ्यांसमोर मांडला प्रश्न

अनियमित वीजपुरवठ्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. वीज समस्येचा व्यावसायिक, विद्यार्थीवर्गाला फटका बसत आहे. अलीकडेच झालेल्या ग्रामसभेतही वीज समस्येचा मुद्दा लोकांनी उपस्थित केला होता, असे सरपंच सौ. घाडी यांनी अधिकाऱ्यांच्या नजरेला आणून दिले. गावातील वीज खांब जुनाट आणि त्यांची दूरवस्था झाली असून त्यापासून धोका निर्माण झाला आहे, अशी कैफियत पंच सदस्य सौ. राऊत यांनी मांडली.

जलस्रोत खात्यावरही मोर्चा

वीज खात्याच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाल्यानंतर सरपंचांच्या नेतृत्वाखालील या गटाने जलस्रोत कार्यालयाकडे मोर्चा वळवला. जलस्रोत खात्याचे अभियंता श्री. पै काकोडे यांची भेट घेवून त्यांच्यासमोर साळ गावाताली पाण्याची समस्या मांडली. गावात १० एमएलडी क्षमतेचा जलप्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मागे पडला आहे.

आता पाण्याची टाकी होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला. मेणकुरे येथील जलप्रक्रिया प्रकल्पाला लवकरच चालना मिळणार आहे. एकदा हा प्रकल्प पूर्णत्वास आला, की पाण्याची समस्या सुटणार आहे, असे अभियंते श्री. पै काकोडे यांनी सांगून तूर्तास साळ गावातील पाणी समस्येवर उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन दिले.

Sal Water
Mahadayi Water Dispute: म्हादई पाणी वाटप प्रकरण; 29 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

साळ गावातील बंधारा प्रकल्पामुळे संपूर्ण उत्तर गोव्यातील जनतेची तहान भागत आहे. मात्र, साळ गावातील जनतेच्या नशिबी पाण्यासाठी रडावे लागत आहे. पाण्यासाठी यापूर्वी आंदोलने करण्यात आली.

मात्र, ही समस्या काही सुटलेली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी साळ गावात जल प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. जलप्रकल्प सोडाच, आता पाण्याची टाकी कधी होणार आणि साळमधील पाण्याची समस्या कधी सुटणार. त्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

- मेघ:श्याम राऊत, समाज कार्यकर्ते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com