ऐन उन्हाळ्यात लिंबूचा दर भिडला गगनाला

केवळ लिंबूच नाही तर इतर भाज्यांचेही भाव वाढले आहेत.
Lemon
LemonDainik Gomantak

पणजी: उन्हाळ्याचा चटका सर्वांनाच जाणवत असला तरी वस्तूंच्या, विशेषत: लिंबाच्या किमतीत वाढ होत असल्याने उन्हाचा तडाखा बसत आहे. केवळ लिंबूच नाही तर इतर भाज्यांचेही भाव वाढले आहेत. सध्या गोव्यात दिसणारे आणि विकत घेतले जाणारे लिंबू हुबळी, बेळगावी आणि कर्नाटकातील काही भागांतून येतात. (prices of lemons increased in the summer)

Lemon
पेडणे येथील ट्रक वाहतुकीमुळे अपघातांची मालिका वाढली

स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना एका विक्रेत्याने सांगितले, “की लिंबूच (Lemon) नाही तर इतर भाज्यांच्या किंमती खरोखरच वाढल्या आहेत. पूर्वी लिंबाची एक गोणी 700 रुपयांना विकत घ्यायची, आता ती 3,500 रुपये आहे. आम्ही एक लिंबू 10 रुपयांना विकतो आणि कोणीही विकत घ्यायला तयार नाही. भाव वाढले आहेत आणि लिंबू खरेदी वर याचा परिणाम दिसत आहे.

देशभरात 10 ते 15 रुपयांच्या दरम्यान एका लिंबूची किरकोळ विक्री होत असल्याने, लिंबाच्या किमतीमुळे घरच्यांचे बजेट विस्कटत आहेत. एकूण उत्पादनात घट झाल्यामुळे लिंबाचा पुरवठा कमी झाल्याचे वृत्त आहे.

भाजीपाल्याचे दर वाढण्यास व्यापारी इंधनाचे वाढते दर जबाबदार आहेत.

“माझ्या 30 वर्षांच्या व्यवसायात (Business), लिंबू जास्तीत जास्त 150 रुपये किलोने विकले गेले, परंतु ते 300 रुपये किलोपर्यंत कधीच पोहोचले नव्हते. डिझेलच्या किमतींमुळे वाहतुकीचा खर्च प्रति ट्रक 24,000 रुपयांनी वाढला आहे,” असे एका घाऊक विक्रेत्याने स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

Lemon
गोव्यातील बोकाळलेला भ्रष्टाचार व मंत्र्यांचा हस्तक्षेप

अवघ्या पंधरवड्यापूर्वी लिंबाची किरकोळ विक्री 50 ते 100 रुपये किलोने होत होती.

दुसऱ्या विक्रेत्यांनी सांगितले की, उन्हाळ्यात पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने दरवाढ झाली आहे. “आम्ही तीन आठवड्यांपूर्वी लिंबू 60 रुपये किलो दराने विकत होतो, जो आता 200 रुपये प्रतिकिलोच्या पुढे गेला आहे. सध्या गोव्यात दिसणारे आणि विकत घेतले जाणारे लिंबू हुबळी, बेळगावी आणि कर्नाटकातील काही भागांतून येतात.

पूर्वी 20 रुपयांना 12 लिंबू मिळायचे मात्र सध्या बाजारात एका लिंबाची किंमत 10 रुपये आहे.

पेट्रोल (Petrol), डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे, जो भाज्यांच्या किमती वाढण्यामागचा एक प्रमुख घटक आहे. 22 मार्चपासून, भारतात इंधनाच्या किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. वाढलेला वाहतूक खर्च आणि अंतिम खरेदी दरात झालेली वाढ यामुळे त्यांना चढ्या भावाने भाजीपाला विकावा लागत असल्याचे भाजी विक्रेते सांगतात. लिंबाच्या वाढत्या किमतीचे आणखी एक कारण म्हणजे पुरवठा आणि मागणीत कमतरता आहे. उन्हाळ्यात लिंबांना जास्त मागणी असते, त्यामुळे आधीच भाव वाढलेले असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com