INDIA Alliance In Goa: गोव्यात इंडिया आघाडीचा आत्मविश्वास वाढला; विधानसभेत 30 जागा जिंकण्याचा दावा

INDIA Alliance In Goa: बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक ही इंिडया आघाडीवर लढविली जाणार आहे. ही जागा आम आदमी पक्षाची होती
INDIA Alliance In Goa
INDIA Alliance In GoaDainik Gomantak

INDIA Alliance In Goa

दक्षिणेची जागा जिंकण्यासाठी भाजपने दबावतंत्र तसेच मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. पक्षांतर व भ्रष्टाचारांना मतदारांनी योग्य धडा शिकविला. सरकारच्या भ्रष्टाचाराला कंटाळून काही कट्टर भाजप नेत्यांनीच त्यांच्याविरोधात मतदान केले, हे मान्य न करता धर्माला दोष देत आहेत.

मत मिळाले, तर ८ मतदारसंघात किंचित कमी मते मिळाली. त्यामुळे आगामी विधानसभेत इंडी आघाडी ३० पेक्षा अधिक जागा जिंकणार असा दावा इंडी आघाडीतील सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी यावेळी केला.

पणजीत इंडिया आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला दक्षिण गोवा नवनिर्वाचित खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष ॲड. अमित पालेकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, शिवसेना अध्यक्ष जीतेश कामत, आमदार ॲड. कार्लोस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार वेन्झी व्हिएगश तसेच एम. के. शेख, तुलिओ डिसोझा उपस्थित होते.

केंद्रात तसेच राज्यात भाजपने केलेला दावा फोल ठरल्याने जनतेकडून त्यांना चांगलीच चपराक बसली आहे. मतांचे ध्रुवीकरण व धार्मिकतेवरून फूट पाडण्याचा केलेला प्रयत्न सफल झाला नाही. पैशांचे आमिष व दबावतंत्रा न बळी पडता भाजपला जनतेने ताकीद दाखवून दिली आहे. देशाची घटना व लोकशाही वाचवण्यासाठी इंडी आघाडी हाच पर्याय असल्याचे ओळखून जनतेने मतदान केले. लोकांसाठी सर्व विरोधी पक्ष आपले वैयक्तिक व राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आल्याने मतदारानीही पाठिंबा दिला. देशातील जनता भाजपच्या कार्यपद्धतीला कंटाळली आहे. पैसा व ताकिदीचा वापर करणाऱ्या भाजपचे ४०० जागा पार करण्याचे स्वप्न उधळून लावले आहे. त्यामुळे त्यांचे वर्चस्व कमी होत असल्याचे या निवडणुकीतून दिसून आले आहे, असे मत यावेळी इंडी आघाडीच्या अध्यक्षांनी तसेच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, उपस्थित आमदार व खासदार विरीयातो फर्नांडिस यांनी व्यक्त केले.

दक्षिणेतील विजय या तेथील जनतेचा तसेच लोकशाहीचा आहे. बेरोजगारी, कोळसा प्रदूषण, दुहेरी रेल्वेमार्ग, म्हादई यासारखे ज्वलंत विषय लोकसभेत उपस्थित केले जातील. नेहमी एकजुटीचा विजय होतो हे जनतेने दाखवून दिले आहे, असे खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले. लोकांनी देशाची घटना व लोकशाही वाचवण्यासाठी यावेळी मतदान केले. राज्यातील सरकार हे भ्रष्ट व अकार्यक्षम आहे. पक्षांतर व भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकांनी मतदान केले. देशासाठी त्याग केलेला उमेदवार इंडिया आघाडीने दिल्याने लोकांनी तो स्वीकारून कौल दिला, असे आमदार विजय सरदेसाई यांनी मत मांडले.

INDIA Alliance In Goa
South Goa: धेंपेंच्या पराभवासाठी ब्रह्मेशानंद स्वामी जबाबदार? तानावडेंचा काँग्रेसकडून निषेध, माफी मागण्याची मागणी

आगामी लोकसभेत भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी हाच पर्याय असल्याचे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते. त्यातूनच इंडिया आघाडीची निर्मिती झाली. २०२७ मध्ये ही आघाडी ३० पेक्षा अधिक जागा जिंकेल. भाजप आयटी कक्षाने अयोध्येत त्यांचे उमेदवार पराभूत झाल्याने हिंदूना दोष दिला आहे, तर गोव्यात ते धर्मगुरुंचा हस्तक्षेप असा आरोप केला आहे. भाजप स्वार्थी असून स्वार्थासाठी ते काहीही करू शकतात, असे ॲड. पालेकर म्हणाले.

आघाडीसाठी प्रयत्न

बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक ही इंिडया आघाडीवर लढविली जाणार आहे. ही जागा आम आदमी पक्षाची होती. सदस्य अपात्र ठरल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे या जागेसाठी आम आदमी पक्षाचाच उमेदवार असेल असे ॲड. पालेकर म्हणाले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही यासंदर्भात इंडी आघाडी एकत्रित बसून निर्णय घेईल तरी ही जागा ‘आप’लाच देण्याला त्यांनी दुजोरा दिला. ही आघाडी टिकवून ठेवण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न असेल असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com