Mumbai Goa Highway: काजळी नदीला पूर! मुंबई-गोवा महामार्ग बंद; पर्यायी मार्ग कोणता?

रत्नागिरीत गुरूवारी मुसळधार पाऊस झाला, यामुळे रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आला आहे.
Mumbai Goa Highway
Mumbai Goa HighwayDainik Gomantak

रत्नागिरीतील काजळी नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नदीवर पूल फार जुना असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरीत गुरूवारी मुसळधार पाऊस झाला, यामुळे रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आला असून, नदी भरभरुन वाहतेय.

काजळी नदी लांजा तालुक्यातून वाहत जाणारी ही नदी रत्नागिरीतून पुढे अरबी समुद्राला मिळते. गुरूवारी दुपारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी पूल वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अंजनारी पूलाच्या येथे थांबवण्यात आली आहे. दोन्ही दिशेने येणाऱ्या वाहनांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

Mumbai Goa Highway
एक तास अगोदर आली अन् प्रवासी न घेताच धावली 'गोवा एक्स्प्रेस', दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसोबत घडला अजब प्रकार

कोणता पर्यायी मार्ग वापरता येईल?

मुंबई - गोवा महामार्ग बंद करण्यात आल्याने रत्नागिरीला जाणारी वाहतूक ही पावस मार्गे वळवण्यात आली आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी पावस मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पुन्हा हा मार्ग खुला केला जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com