Sadanand Tanavade On Narendra Modi: विकसित भारत २०४७ लक्ष्य घटनेसाठी सरकारने टाकलेली पावले योग्य आहेत
Sadanand Shet Tanavade Twitter

Sadanand Tanavade: मोदी सरकारच्या काळातच स्वच्छतेचे आंदोलन; सदानंद तानावडे

Sadanand Tanavade On Narendra Modi: विकसित भारत २०४७ लक्ष्य घटनेसाठी सरकारने टाकलेली पावले योग्य आहेत
Published on

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळातच देशभरात स्वच्छतेचे आंदोलन उभे राहिले, असे निरीक्षण खासदार सदानंद शेट तानवडे यांनी आज राज्यसभेत नोंदवले. शहरी विकास खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना ते बोलत होते.

ते म्हणाले, भाजप सरकारने प्रत्येक बेघराला घर मिळवून दिलेले आहे. सार्वजनिक शौचालये उभारली तसेच प्रत्येक घराला शौचालय मिळेल याची तजवीज केली. विकसित भारत २०४७ लक्ष्य घटनेसाठी सरकारने टाकलेली ही योग्य पावले आहेत.

जनतेचे जीवनमान सुधारण्यावर सरकारने भर दिलेला आहे. जागतिक दर्जाची मेट्रो व रेल्वे सेवा सुरू करून प्रदूषण कमी केलेले आहे. रेरा अधिनियम लागू करून घर खरेदी व्यवहारात पारदर्शकता आणली आहे. यामुळे ग्राहकांचा विश्वासवाढला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com