Viresh Borkar: '..तर गोमंतकीयांसाठी जागा राहणार नाही'! जमीन संरक्षण विधेयकासाठी आंदोलन आवश्यक; आमदार बोरकर

Land Conversion Bill For Goa: राज्यातील जमिनींचे संरक्षण करण्यासाठी जमीन संरक्षण विधेयक गरजेचे आहे. मी ते विधेयक विधानसभेत देखील मांडले होते. नियंत्रण आणायचे असेल, तर कायदा अत्यावश्यक आहे, हे मी पूर्वीपासून सांगत आल्याचे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.
Land Conversion Bill For Goa: राज्यातील जमिनींचे संरक्षण करण्यासाठी जमीन संरक्षण विधेयक गरजेचे आहे. मी ते विधेयक विधानसभेत देखील मांडले होते. नियंत्रण आणायचे असेल, तर कायदा अत्यावश्यक आहे, हे मी पूर्वीपासून सांगत आल्याचे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.
Viresh Borkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Needs Land Conservation Bill Says MLA Viresh Borkar

पणजी: राज्यातील जमिनींचे संरक्षण करण्यासाठी जमीन संरक्षण विधेयक गरजेचे आहे. मी ते विधेयक विधानसभेत देखील मांडले होते. मात्र, त्याला सरकारचा पाठिंबा मिळाला नाही. त्यावर नियंत्रण आणायचे असेल, तर कायदा अत्यावश्यक आहे, हे मी पूर्वीपासून सांगत आल्याचे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले. दरम्यान, या विषयावर चर्चा करण्यासही मी तयार आहे, असे ते म्हणाले.

सांकवाळ येथील भूतानी प्रकल्पाला दिलेली परवानगी रद्द करण्यासाठी माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचा पाठिंबा आहे का असे विचारले असता विरेश बोरकर म्हणाले, की प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि विविध माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचविण्याचा अधिकार आहे. नाईक एका प्रकल्पाला दिलेली परवानगी रद्द करण्यासाठी आमरण उपोषण करत आहेत.

आंदोलन आणि उपोषण करून काहीच फायदा नाही. कारण याआधी आम्ही खूप आंदोलने केली, पण आजही ते प्रकल्प सुरूच आहेत. त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे व त्यासाठी लोकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याची गरज आहे.

Land Conversion Bill For Goa: राज्यातील जमिनींचे संरक्षण करण्यासाठी जमीन संरक्षण विधेयक गरजेचे आहे. मी ते विधेयक विधानसभेत देखील मांडले होते. नियंत्रण आणायचे असेल, तर कायदा अत्यावश्यक आहे, हे मी पूर्वीपासून सांगत आल्याचे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.
जर्मन राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याचा शेवट गोवा भेटीने! विद्यार्थ्यांशी साधला संवाद; भारताबाबत केले मोठे विधान

सरकार कोमुनिदाद जमिनी संपविण्यासाठी पुढाकार घेत आहे. म्हणूनच लोकांनी कायदा करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. जर आम्ही जमीन संरक्षण विधेयक आणले नाही, तर भविष्यात गोमंतकीयांसाठी जागा राहणार नाही. आज राज्यातील जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कायदा आणणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com