
Mumbai Goa Highway Traffic Jam
रायगड: नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकण आणि गोव्यात दाखल होत आहेत. पण, इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वी पर्यटकांना मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून या महामार्गावर वाहनांची वर्दळ पाहायला मिळत आहे. नव्या वर्षाच्या तोंडावर देखील या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवा आणि कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होताहेत. मुंबई - गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्याने लोणेरे, माणगाव आणि इंदापूर पोयनाड येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे पर्यटकांना मार्गावर ताटकळत थांबावे लागत आहे.
थर्टी फर्स्टच जल्लोष आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण गोवा आणि कोकणात येत आहेत. तसेच, रायगडमधील अलिबाग येथे जाण्यास पसंती देत आहेत. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावरुन जाताना पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ख्रिसमस, सनबर्न आणि थर्टी फर्स्टसाठी अनेकजण गोव्यात येत होते. त्यामुळे २५ डिसेंबरपासून महामार्गावर कोंडी निर्माण होत होती. आज पाचव्या दिवशी देखील कोंडी सुरुच असल्याचे चित्र आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.