
In Goa vegetables and fish prices are on the rise
Dainik GomantaK
Panaji: भाजीपाल्यांच्या आणि माशांच्या दरात नेहमीच चढाओढ सुरू असते. कोकण आणि गोव्यासाठी कोल्हापूर, बेळगाव आणि परिसरातून भाजीपाला रोज येत असतो. कोल्हापूर आणि बेळगाव बाजारपेठांमध्ये कांद्याचा दर 20 रुपयांच्या आसपास तर बटाट्याचा दर 7 रुपयांपासून 12 रुपयांच्या दरम्यान असताना गोव्यात कांद्याचा दर 50 रुपयांहून अधिक तर बटाट्याचा दर 30 रुपयांहून अधिक आहे.
राज्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर 100 रुपयांच्या वर गेल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसली आहे. भाजीपाल्याबरोबर मासळी आणि चिकनच्या दरानेही या महागाईला साथ दिली आहे. भाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याविषयी व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता पर्यटन हंगाम असल्याने मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे दर वाढल्याचे त्यांनी सांगितले आहे. अचानक पडणाऱ्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारपेठांमध्येच भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे खुल्या बाजारपेठेतील किमतीही वाढल्या आहेत.
मांसाहाराच्या किमती:
बांगडे 200 रु.
पापलेट 700 रु.
कोळंबी 400 रु.
चिकन 140 रु.
मटण 700 रु.
अंडी 70 रु.
भाजीपाल्याच्या किमती:
टोमॅटाे 60 रु.
बटाटा 40 रु.
कांदे 50 रु.
भेंडी 120 रु.
वांगी 120 रु.
भाजीपाल्याला जेवढी मागणी असते तेवढीच मागणी चिकन आणि मटण यांनाही असते. 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी पार्ट्या होत असल्याने माेठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. मासे आणि अंडी यांचीही मागणी वाढल्याने गोमंतकीयांसमोर पेच निर्माण झाला आहे. मासे हे बहुतेक गोवेकरांच्या जेवणातील नेहमीचा पदार्थ आहे. मात्र, त्यांचेही दर आवाक्याबाहेर गेले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.