

पणजी: वीजखांबावरील बेकायदेशीर फायबर केबल्सबाबत वीज विभागाने दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांविरुद्ध पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वीज विभागाचे नोडल अधिकारी व कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी तक्रारीत म्हटले आहे.
विभागाने म्हटले आहे की, या बेकायदेशीर कामांमुळे सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून सरकारला सुमारे ११० कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. वीज विभागाचे नोडल अधिकारी व कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी एजकॉम टेलिकॉम आणि डिजिटल नेटवर्क असोसिएट्स कंपन्यांच्या संचालकांविरुद्ध ही तक्रार दाखल केली आहे.
वीज विभागाने ३ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी केलेल्या नोटिशीनुसार, कंपन्यांना १० दिवसांच्या आत सर्व बेकायदेशीर केबल्स काढून घेण्याचे आदेश दिले होते.
तक्रारदार काशिनाथ शेट्ये यांनी असेही आरोप केले आहेत की, ही कायदेशीर प्रक्रिया रोखण्यासाठी काही प्रभावी राजकीय व्यक्तींच्या मदतीने सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक आणि मडगाव पोलिस निरीक्षकांकडेही एजकॉम टेलिकॉम, महादेव गोवेकर, एथेरनेट व अन्य काहीजणांवर ही तक्रार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.