Goa Monsoon: गोव्यातील प्रमुख धरणांमध्ये किती पाणी शिल्लक आहे? जाणून घ्या...

पाणी टंचाई जाणवणार
Goa Monsoon
Goa MonsoonDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon: गोव्यात मॉन्सून दाखल झाला असला तरी पावसाने ओढ दिली आहे. बिपरजॉय वादळामुळे मॉन्सून गोव्यात वेगाने दाखल तर झाला, मात्र गेल्या काही दिवसांत राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.

त्याचा परिणाम राज्यातील जलसाठ्यांवर झाला असून धरणांमध्ये खूप कमी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

Goa Monsoon
Goa Police: सोशल मीडियात शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाला अटक

पावसाला सुरवात न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेतच पण अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. सध्या गोव्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या अंजुणे धरणात केवळ 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

तर आमठाणे धरणात 40 दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. ओपा येथे दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

Goa Monsoon
Goa Narcotic Raid: सांगोल्डा येथे पोलिसांच्या छाप्यात 2.80 लाखांचे अमली पदार्थ जप्त

असा आहे गोव्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा

अंजुणे -------------- 3 टक्के

आमठाणे ---------- 41 टक्के

साळावली -------- 21 टक्के

चापोली ----------- 41 टक्के

पंचवाडी ---------- 02 टक्के

गावणे ------------ 36 टक्के

तिलारी------------ 96 टक्के

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com