Panaji : सरकार आमच्या संयमाचा अंत पाहतेय का? पणजीकरांचा सवाल

कांपाल रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी
Traffic jam Panjim
Traffic jam PanjimDainik Gomantak

राजधानी पणजीत स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. परंतु आता वाहतूक कोंडी, सर्वत्र सुरू असलेली खोदकाम, खड्डे आदींमुळे पणजीकरांचा संयम सुटत असून सरकारने आता पणजीकरांच्या संयमाचा अंत पाहू नये, अशा तीव्र प्रतिक्रिया पणजीकरांकडून व्यक्त होत आहेत.

स्मार्टसिटी अंतर्गत जी कामे सुरू आहेत. त्या मनमानी कारभाराबाबत लोकांत प्रचंड चीड आहे. विकासाच्या नावाखाली सामान्यांची पिळवणूक सुरू असल्याचे मत स्थानिक व्यक्त करत आहेत.

भरदुपारी कांपाल रस्त्यावर डांबरीकरण काम सुरू होते. त्यामुळे वाहन, बसेसना तासंन् तास कोंडीत रहावे लागले. अशी कामे रात्री ७ नंतर रस्ता बंद करूनही करता येतील. यासाठी जनतेला का वेठीस धरले जातेय, असा सवाल लोक करत आहेत.

दीड वर्षांपासून त्रास !

जी-२० च्या काही बैठका गोव्यात होणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या मान्यवरांना गाडीने सुरळीत प्रवास करता यावा यासाठी सरकार रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात डांबरीकरण करत आहे. परंतु काही तास येणाऱ्या व्यक्तींसाठी रस्ता करत आहेत.

तर गेल्या वर्षे-दीडवर्षांपासून सर्वसामान्य पणजीकरांना जो मनपा व स्मार्ट सिटी कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे होणारा त्रास केव्हा संपणार, असा सवालही पणजीकर करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com