Panaji Enviornment: राजधानी पणजी हवामानाच्या दृष्टीने असुरक्षित; सर्व्हेत मिळाले केवळ 2 स्टार रेटिंग

शहराला हवामान बदलाचा मोठा धोका
Panaji  City Environment
Panaji City EnvironmentDainink Gomantak
Published on
Updated on

Panji Enviornment: हवामान सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नात देशात सर्वेक्षण केलेल्या 15 भारतीय शहरांमध्ये गोव्याची राजधानी पणजी हे शहर मागे पडले आहे. पणजी शहराची कामगिरी यादृष्टीने वाईट झाली आहे. या यादीत अहमदाबाद टॉपवर आहे. याचा अर्थ अहमदाबादची अवस्था पणजीपेक्षाही वाईट आहे.

क्लायमेट सेंटर फॉर सिटीज आणि ICLEI दक्षिण आशियाने याबाबतचा अहवाल केला आहे. आणि त्यामध्ये पणजीला केवळ दोन-स्टार रेटिंग देण्यात आले आहे. याचा अर्थ पणजी शहराला त्यात खूप सुधारणा करणे आवश्यक आहे.

Panaji  City Environment
सुखी संसाराचे स्वप्न भंगले; बाणस्तारी मर्सडीज अपघातातील जखमी वनिता 8 महिने अंथरूणाला खिळून राहणार, आईला सोडावी लागली नोकरी

याचे सर्वात मोठे कारण आहे पणजीतील वाहतूक. पणजीत सर्वाधिक उर्जा वापर वाहतूक क्षेत्रात होतो. येथे 64.8 टक्के कार्बन इंधन वापरले जाते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार या 15 शहरांमध्ये पणजीमध्ये दरडोई ऊर्जा वापर, दरडोई वीज वापर आणि दरडोई हरितगृह वायूंचे उत्सर्जन या डेटाचे एकत्रित विश्लेषण केले गेले.

पणजीसाठी हवामान कृती आराखडा आवश्यक आहे. कारण हे शहर किनारपट्टीवर आहे. कुरे खाडी, सांत इनेज खाडी, मांडवी आणि झुआरी नदीमधील बॅकवॉटरवरील खारफुटीचे जतन, संवर्धन गरजेचे आहे. अन्यथा या हवामान बदलाची मोठी किंमत चुकवावी लागू शकते,” असे अहवालात म्हटले आहे.

पर्यटनाची शाश्वत पद्धत, अक्षय उर्जा स्त्रोतांना प्राधान्य, महत्वाच्या परिसंस्थांचे जतन, हवामानास अनुकूल कृषी तंत्रांचा अवलंब करणे ही आवश्यक पावले त्यासाठी उचलणे गरजेचे आहे.

Panaji  City Environment
Porvorim News: माजी मंत्र्यांच्या मुलाची मैत्रिणीसह तरूणांसोबत फ्रीस्टाईल हाणामारी; पर्वरीतील बारमध्ये प्रकार, पाहा व्हिडिओ

या अभ्यासात अहमदाबाद, कोईम्बतूर, ग्वाल्हेर, कोची, नागपूर, पिंपरी चिंचवड, राजकोट, शिमला, सिलीगुडी, ठाणे, तिरुचिरापल्ली, तिरुनेलवेली, उदयपूर आणि वडोदरा या शहरांचाही समावेश आहे.

जलद नागरीकरण, कचरानिर्मिती, उर्जावापर यातून ही गजबजलेली केंद्रे मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जनाचे केंद्र बनली आहेत. लोकसंख्या वाढते तसा संसाधनांवर ताण येतो, त्यातून पर्यावरणीय समस्या आणि हवामान बदल वाढतात, असेही अहवालात म्हटले आहे.

पर्यावरणपूरक धोरणांचा स्वीकार करण्यासाठी तातडीची कारवाई आवश्यक आहे. तरच शहरी झगमगाट आटोक्यात आणून हिरव्यागार, अधिक लवचिक भविष्यासाठी मार्ग तयार करता येईल, असे अहवालात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com