
पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल पाहायला मिळत आहे. या अनिश्चित हवामानामुळे शेतकरी आणि बागायतदार यांची चिंता वाढली आहे. आता हवामान विभागानं २५ आणि २६ एप्रिल २०२५ या २ दिवसासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
सततच्या वातावरणातील बदलामुळं गोमंतकीय हैराण झाले आहेत. प्रत्येक दिवशी वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. कधी कडक ऊन, तर कधी गडगडाटासह पावसाची हजेरी लागते.
राज्यातील आंबा आणि काजू बागायतदारांसाठी हे अस्थिर हवामान धोक्याची घंटा ठरत आहे. मार्च ते मे हा कालावधी आंबा आणि काजूच्या उत्पादनाचा अत्यंत महत्त्वाचा हंगाम मानला जातो. मात्र, सततच्या बदलत्या हवामानामुळे फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
राज्यात वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी सत्तरी तालुक्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाल्यानं अनेक झाडे कोसळली होती. या पावसात लाखो रुपयांचे नुकसान झालं होतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.