Goa News: 'कालचक्र' हा महाभारताचा केंद्रबिंदू- गणेश देवी

Goa News: महाभारतातील मिथक कोणते अन् इतिहास कोणता हे सांगणे कठीण.
Goa News | Ganesh Devi
Goa News | Ganesh DeviDainik Gomantak

Goa News: हजारो पुस्तके महाभारतावर लिहिली आहेत. ज्यांनी कधी पुस्तके पाहिली त्या आदिवासींना देखील महाभारत माहित आहे. महाभारतातील मिथक कोणते आणि इतिहास कोणता हे सांगणे कठीण. मात्र, महाभारताचा केंद्रबिंदू वेळ आहे. कालचक्र हा महाभारताचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन भाषा अभ्यासक गणेश देवी यांनी केले.

मिथक आणि संस्कृती अभ्यास केंद्र आणि कला संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाभारत द एपिक ॲण्ड द नेशन’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ज्ञानपीठप्राप्त दामोदर मावजो, पांडुरंग फळदेसाई, विद्या कामत पार्थन उपस्थित होते.

Goa News | Ganesh Devi
Goa Government: 'रस्ते होतील, थोडी कळ सोसा'- प्रमोद सावंत

गणेश देवी म्हणाले, ‘अरबिंदोच्या मते, रामायण हे उत्कृष्ट काव्य आहे तर व्यास हे उकृष्ट कवी मानतात. व्यास नायकांमध्ये गुरफटत नाहीत, ते वेळेला महत्त्व देतात. ग्रीक आणि भारतीय मिथकात साम्य जाणवते. आता ही मिथके ग्रीकमधून भारतात आली, की भारतातून ग्रीकमध्ये गेली हा संशोधनाचा विषय आहे.

महाभारतातील वेळ ही सामाजिक, मिथकीय तसेच विविधांगी आहे.’ या कार्यक्रमात दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बालाजी शेणवी तर राजू शिंक्रे यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com