Goa Beach: समुद्र किनारी जमिनीच्या रक्षणासाठी निधीची मागणी करणार - शिरोडकर

Goa Beach: जमिनींचे सर्वेक्षण केला जाणार असून अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल.
Subhash Shirodkar | Goa News
Subhash Shirodkar | Goa News Dainik Gomantak

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनारी भागातील 50 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून ती वाचवण्यासाठी अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल केंद्र आणि जागतिक बँकेला सादर करून त्यांच्याकडून कामासाठी निधी मागणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

पर्वरी येथे मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या बांध प्रणालीकडे दुर्लक्ष केल्याने, तसेच हवामानात बदल झाल्याने जमीन पाण्याखाली जाण्यासाठी दोन प्रमुख कारणे आहेत.या जमिनींचे सर्वेक्षण केला जाणार असून अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल.

Subhash Shirodkar | Goa News
Goa Beach: किनाऱ्यांवर नियमांचे उल्लंघन

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील कालव्यातून 15 नोव्हेंबरपर्यंत पाणी सोडले जाईल. याचा लाभ सांगे, केपे, काणकोण, फोंडा, सत्तरी, पर्ये, वाळपई आणि डिचोली गावांतील सुमारे 1500 शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com