
सासष्टी: राज्य सरकारने महिना १६ हजार लिटरपर्यंत पाणी मोफत देणारी योजना १ मे पासून स्थगित केली आहे. यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर टीका केली. ही योजना बंद करून सरकारने लोकविरोधी अजेंडा उघड केल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
या योजनेचा फायदा ४८ टक्के ग्राहकांना होत असे. आता त्यांना पूर्वीप्रमाणे पाण्याचे बिल भरावे लागेल. ही योजना आकस्मिक स्थगित करण्याचा निर्णय म्हणजे गोव्यातील गरीब व गरजू लोकांप्रती सरकार असंवेदनशील असल्याचे दाखवून देणे असाच त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे अशा लोकांच्या कल्याणाकडे दुर्लक्षित करते हे सरकारने दाखवून दिले आहे, असेही सरदेसाई यानी म्हटले आहे.
यापूर्वी सरकारने लोकांना ३ एलपीजी गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्र्वासनाची पूर्तता सरकार करू शकले नाही. मोफत पाण्याची योजना बंद केल्याने जे लोक आर्थिक संकटातून जात आहेत त्यांच्यावर विपरीत परिणाम होणार आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
लोकांसाठी जास्तीत जास्त कल्याणकारी योजना सुरू करण्याऐवजी सरकार सुरू केलेल्या योजनाच बंद करीत आहे. सरकारची ही कृती अन्यायकारक, अक्षम्य व गोमंतकीय विरोधी असल्याचेही सरदेसाई यांनी शेवटी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.