
पणजी: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून दयानंद सामाजिक सुरक्षा योजना राबवण्यात येते. मात्र या योजनेतील घोळ पुन्हा एकदा समोर आला आहे. समाज कल्याण खात्याकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल 13 हजार बोगस लाभार्थी सापडले असून त्यांच्याकडून 50 कोटी वसूल करण्यात आले आहेत. यापूर्वी, या योजनेच्या 14 हजार अपात्र लाभार्थ्यांची नावे समाज कल्याण संचालनालयाने वगळली होती. यात पूर्णपणे व्यवसाय करणाऱ्या 2000 लाभार्थ्यांचा समावेश होता. त्यांच्याकडून 39 कोटी रुपये वसूल करण्यात आले होते.
दरम्यान, समाज कल्याण खात्याकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल 13 हजार बोगस लाभार्थी सापडले आहेत. त्यांच्याकडून 50 कोटी वसूल करण्यात आले आहेत. बोगस लाभार्थ्यांमध्ये मृत्यू झालेले, परप्रांतीय आणि या योजनेसाठी पात्र नसलेल्यांचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या सर्वेक्षणात नजर चुकीने आणि इतर कारणांमुळे काही जिवंत असलेले पात्र लाभार्थी जिवंत नसल्याचे खात्याकडून बॅंकांना (Bank) पाठवलेले पत्र मागे घेऊन अशांचे न मिळालेले पैसे देऊन त्यांची योजना सुरु ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकरांनी दिली.
समाजकल्याण खात्याच्या वतीने दयानंद सामाजिक सुरक्षा योजना राबवण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विधवा महिलांना (Women) मदतनिधी दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या योजनेंतर्गत महिन्याकाठी 2 हजार रुपये दिले जातात. यातील लाभार्थ्यांसाठी सुरुवातीला राज्य सरकारने वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 25 हजार रुपये ठेवली होती, परंतु आता ती वाढवून दीड लाख रुपये करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.